Blog

डाॅ.अभिमन्यु टकले यांच्या प्राचार्य पदास मआवि नाशिक ची मान्यता

डाॅ. अभिमन्यु टकले यांच्या प्राचार्य पदास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी ११ वर्षा साठी मान्यता प्रदान केली आहे.

अभिमन्यु टकले हे महाराष्ट्र शासकीय सेवेत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय आतर्गंत परिचर्या विभागात विविध पदावर कार्यरत होते. त्यांचे बीएस्सी नर्सिंग पिबी व पिजी हे शिक्षण आयएनई जे जे रुग्णालय मुंबई येथे झाले आहे.

महाराष्ट्र शासना मार्फत त्यांची सहायक प्राध्यापक गट ब राजपत्रित या पदावर निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी परिचर्या महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे प्राध्यापक,उप प्राचार्य, प्राचार्य या पदावर कार्यरत होते. ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पदवी व पदव्युत्तर, संशोधन मार्गदर्शक, मान्यताप्राप्त प्राध्यापक आहेत. त्यांचे पिजी,मेंटल हेल्थ, सायक्याट्रीक नर्सिंग (मनोरुग्ण परिचर्या) या विषयात झाले आहे.

त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक, क्षेत्रातही खूप मोठ कार्य आहे.

ते सध्या एम.एम. पटेल ट्रस्टमार्फत चालवले जानार्या, श्रीमती कमलाबेन पटेल एएनएम,पॅरामेडिकल, बिएस्सी नर्सिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. हे महाविद्यालय अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय कुभांरी दक्षिण सोलापूर येथे संलग्न आहे.तसेच हे महाविद्यालय आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संलग्न आहे.या महाविद्यालयाचे बिपीनंभाई पटेल, कार्यकारी विश्वस्त मेहुल पटेल, सौ.दिप्ती पटेल, सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी प्राचार्य टकले यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांचे सर्व स्तरातून राज्य भरातून अभिनंदन होत आहे.

READ MORE
Blog

सत्ते साठी धर्म दिसतो जाती त्यांच्या समस्या दिसत नाहीत का? डाॅ.अभिमन्यु टकले.

सध्या लोक सभेचे वादळ देशभरात घोंगावत आहेत. मी 48 लोकसभा धनगर जमातीने लढवाव्यात असे लिहले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांने मला लिहले एक तर तुमच्या कडे मोदींना पर्यायच नाही.दुसरे भाजपने सर्व जाती जातीत भांडण लावून बरोबर करून ठेवलेले आहे. मराठा ओबीसीला मतदान करनार नाहीत. ओबीसी जाती मराठ्यांना मतदान करणार नाहीत.धनगर जमातीला कोणीही लोसभा उमेदवारी देणार नाहीत. राष्ट्रीय समाज पक्षाला उमेदवारी देऊ असे पवार साहेब म्हणाले असले तरी पहिली पसंती मोहीते पाटलांना, दुसरी पसंती निंबाळकर यांना, तिसरी पसंती राष्ट्रीय समाज पक्ष.जर राष्ट्रीय समाज पक्षाने दगा बाजी केली तर माजी आमदार नारायण पाटील यांना ही उमेदवारी देवू शकतात. स्वर्गीय मा.मंत्री गणपतराव देशमुख यांचे नातू डाॅ.अनिकेत देशमुख ही उमेदवारी मागत आहेत.डाॅ अनिकेत यांना उमेदवारी दिली तर महाराष्ट्र राज्यातून पवार साहेब यांच्या पक्षाला धनगर जमातीचे मतदान होऊ शकते. बारामती,सांगली, सोलापूर या खासदारकीच्या तिनही जागा राष्ट्र वादी मुळे येवू शकतात.

खर तर उमेदवार असा असावा की सर्व सामान्य माणूस ही त्याना भेटेल. सध्याचे माढ्याचे खासदार महागरवीष्ट होते.सर्व सामान्य माणसाना भेटत नसत खरंतर असे खासदार काय कामाचे? धनगर जमातीने सध्याच्या खासदारांना मतदान करू नये? माढा आणि निंबाळकर पाडा ही मोहीते पाटील यांची घोषणा योग्यच आहे.

मला सांगा माढ्याचे खासदाराला आपण मतदान केले पण एखाद्या धनगर जमातीच्या कार्यक्रमात यांना पाहीले का? यांनी सरकारकडून फुकट मिळणारा चहा कधी जमातीच्या माणसाला पाजला का?अशा लोकांना मतदान करून काय करणार?

सोलापूरचे खासदार तर जातीचे खोटे प्रमाणपत्र घेऊन खासदार झाले.त्यांनी तर महाराज असून लबाडी करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून खासदार की मिळवली. भाजपने ही त्यांना पाठीशीच घातले.हे महाराज सर्व धर्मा च्या कार्यक्रमाला जात पण धनगर समाजाच्या मदतीला आणि कार्यक्रमाला कधी दिसले का?

आपले शिष्टमंडळ नागपूर येथे केंद्रीय मंत्रि यांना आरक्षण व धनगर जमातीच्या व्यथा मांडण्या साठी गेले त्यांनी स्पष्ट सांगीतले परत धनगर जमातीने माझ्याकडे अशा मागण्या आणू नयेत. मी जात आणि आरक्षण याच्या विरोधात आहे. नंतर मी साहित्य संमेलन निमंत्रण घेवून गेलो होतो नागपूर कार्यालयात. त्यांनी दोन वेळा स्वागत केले तिसर्या वेळेस केंद्रीय वाहतूक मंत्री येणार की नाही याच्या चौकशीला गेलो तर मला स्पष्ट सांगण्यात आले आम्ही जातीच्या कार्यक्रमाला जात नाही, यांचा अर्ज काढून टाका.
आणखी एक दिल्लीतील अनुभव. श्री संजय काका पाटील भाजप सांगली खासदार यांनी धनगर जमातीच्या शिष्टमंडळास खासदार निवासात मुक्कामाची परवानगी दिली. पण धनगर समाजाचे लोक मटण खातात म्हणून रात्री बारा वाजता निवासातून हाकलून दिले. यांना मटण खानारांचे मतदान चालते . धनगर चालत नाहीत.

नागपूरहून आखाती देशात शेळया मेंढ्या निर्यात होणार होत्या परंतु सर्व झालेले नियोजन भाजप ने रद्द केले. का रद्द केले तर तिकडे त्यांची हत्या होईल.

दहा वर्षांत धनगर जमातीला काय मिळाले तर एका विद्यापीठाचे लेबल बदलून दिले आणि धनगर मते मिळावीत म्हणून आता अहमदनगर चे अहिल्यानगर नामकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाला कळवणार आहेत. नामकरण झालेले नाही. पण बर्याच नवरदेवानी लग्ना आगोदर वरातीची मिरवणूक काढल्याचे दिसते. फक्त संस्थाचे लेबल बदलून विकास होणार आहे का? यांना धर्माच्या नावाखाली सर्व जातीची मते चालतात जात चालत नाही. भाजप च्या मुख्य निर्णय पक्षात फादर बाॅडी मध्ये एकही धनगर नाही.धनगर समाजाला एनटी, ओबीसी,व्हीजे एनटी भाजप सेलची पदे दिलेली आहेत. शहर, जिल्हाध्यक्ष पद नगण्य आहेत. आपण म्हणजे धनगर जमातीने २०१४ ला पंढरपूर ते बारामती मोर्चा मार्फत धनगर समाज काँग्रेस राष्ट्रवादीतून काढून भाजप कडे वळवला होता. काँग्रेस राष्ट्रवादीतून एमआय एम मार्फत मुस्लिम बाहेर काढले म्हणून भाजप सरकार आले होते.

२०१९ला धनगर समाजा मुळे भारिप बहुजन महासंघाचे रूपांतर वंचित बहुजन पक्ष असे झाले होते यामुळेही भाजप चाच फायदा झाला होता.या वेळेस धनगर नसल्यामुळे वंचित बहुजन हा फक्त बहुजन राहीला आहे. गेल्या वेळेस प्रा राम शिंदे साहेब व महादेव जानकर साहेब हे भाजप मध्ये कॅबिनेट मंत्री होते, एक राज्य सभा सदस्य होते. या वेळेस भाजप ला नवीन भ्रष्टाचारी मित्र मिळाले धनगर राजकारणात ग्रहीत धरत बासनात गुंडाळून ठेवले आहेत.

यांना राजकारण करण्यासाठी धर्म लागतो, सत्ते साठी जातीची मते चालतात. जातीचे आरक्षण,समस्या आल्या की याच्या डोळ्यात काय जाते हे त्यानाच माहीत. त्यामुळे आपण आता तरी डोळे उघडू. काँग्रेस धनगर समाजाचा रोष भोगतेय. आपण आजही यांना तिकीटे जागा मागतो हेच दुर्दैव आहे. त्यामुळे जैसे है या स्थितीत निवडणूक लढवाव्यात. सांगली सोलापूर व माढा भाजपला राजकीय द्रुष्ट्या गाढा.माढा फसवलेले सगळे गाडा.आपली राजकीय शक्ती निर्माण करा. नेते ग्रहीत आणि मतदार वार्यावर. हीच वेळ आहे.

जनता जाग्रुतीची हीच वेळ आहे. येते सहा महिने सर्व चळवळी बंद ठेवा राजकीय एक व्हा.४८ आणि २८८ लढवाव्यात.

मराठा, धनगर समाजाने या मुजोर, भ्रष्ट नेत्याना गाव बंदी न करता प्रचार बंदी करावी.आपल्याला दहा वर्षे गाजर दाखवलेत. यांना ही गाजर दाखवा परत पाठवा.

समाजाचा मान हाच आपला खरा सन्मान.
जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत.

READ MORE
Blog

पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन बेलाटी महाराष्ट्र राज्य दि.२४|२५ फेब्रुवारी २०२४ यशस्वी केल्याबद्दल जाहीर आभार . संयोजकांचे जाहीर अभिनंदन

साहित्य संमेलन म्हणजे समाजात विविध विषयांवर लेखन, वक्तवे करणारे ,विविध क्षेत्रातील बौद्धीक मान्यवर एकत्र येऊन विचार मथंन करून समाजाचा भूतकाळ,वर्तमान, भविष्य याचा वेध घेवून प्रचार प्रसार करने म्हणजे साहित्य संमेलन.साहित्य संमेलन मेळावा,किंवा जत्रा,यात्रा नसते.किती संखेने लोक सहभागी झाले याला महत्व नसून किती विचारवंत एकत्र आले व काय चर्चा झाली याला महत्व असते. बौद्धीक द्रुष्ट्या किती लोक समाजात निस्वार्थ पणे जिवंतआहेत याचा पुरावा व जमातीचा आरसा म्हणजे साहित्य संमेलन.

आपण पहातो अनेक स्वयंघोषित, पत्रकार,लेखक, नेते हे ईतिहास, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक गप्पा मारताना,सल्ले देताना दिसतात वेळ आल्यानंतर ते कोठेच दिसत नाहीत. ईतिहास पुरूषांच्या जयंती पुण्य तिथीला ईतिहास माहिती नसताना भरघोस पैसा गोळा करून राजकीय स्वार्था साठी दुकाने थाटून नाचनारी गिधाडे अनेक दिसतात. पण खरा ईतिहास, साहित्य, संस्कृती , जतन, संवर्धन, करण्याचे काम हे साहित्य संमेलन करत असते.

पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन बेलाटी उत्तर सोलापूर महाराष्ट्र राज्य याची पहिली बैठक दि.३१डिसेबर २०२३ रोजी बाळू मामा मंदिर विजापूर बायपास बेलाटी येथे झाली होती. दिनांक ०३|०२|२०२४ रोजी साहित्य संमेलन जाहीर केले .
तयारी साठी विस दिवस अवधी होता.त्या ठिकाणी एकदम जवळ कोणतीच मानवी वस्ती नव्हती. सोलापूर पासून ९|१० किमी. येण्या जान्यासाठी वाहन व्यवस्था नव्हती. त्यामुळे लोक येणार नाहीत असे अनेक जाणकारांचे मत होते.
तरीही मी ,श्री उज्ज्वलकुमार माने पत्रकार लेखक, सिध्दारूड बेडगनूर सर , श्री बिसलसिद्ध काळे, प्रा .श्री देवेंद्र मदने सर, आम्ही नियोजन करत होतो.

श्री आर एस चोपडे सर, श्री संभाजीराव सुळ,श्री चंद्रकांत हजारे,श्री संजय सोनवनी इतिहास कार व संशोधक, प्राचार्य डाॅ.मधुकर सलगरे लेखक, ऐडव्होकेट रामहरी रूपनवर मा.आमदार नियोजीत अध्यक्ष मार्गदर्शन करत होते.
श्री सिध्दारूड बेडगनूर सर यांनी संयोजन आणि ग्रंथ दिंडी, सांस्कृतिक कार्यक्रम जबाबदारी घेतली.त्यांना सहकार्य देवेंद्र मदने सर करत होते.श्री उज्ज्वलकुमार माने यांनी परिसंवाद आणि साहित्यिक पाठपुरावा याची जबाबदारी घेतली.बिसलसिध्द काळे समन्वयक म्हणून काम करत होते. या लोकांनी खूप कष्ट करून साहित्य संमेलन यशस्वी केले. ईतिहास आणि समाज त्यांचा नेहमीच ऋणी राहील.

मी स्वतः एक, श्री संभाजीराव सुळ उपाध्यक्ष यांनी एक,प्राचार्य आर. एस. चोपडे सर एक अशा फक्त तिन पत्रकार परिषदा झाल्या. राज्यभरातून प्रिंट मिडीयाने,लिडींग सर्व दैनिकानी भरपूर कार्यक्रमाची प्रसिद्धी केली. ऑल इंडिया रेडिओ नी छान बातम्या दिल्या. सरकारी मुलाखत ही प्रसारीत केली.शेवटचे पंधरा दिवस आमोल पांढरे पत्रकार सहभागी झाले. श्री सिध्दारूड बेडगनूर सर, श्री ओंकार बेडगनूर सर, धर्मसाळी सर, श्री होनमाने सर यांनी १५ दिवस व शेवटचे दोन दिवस प्रंचड कष्ट घेतले. ग्रंथ दिंडी, सुत्र संचलन,सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडला. श्री गोविंद काळे यांनी कवी संमेलनासाठी मदत केली. अहमदनगर, पुणे येथील पुस्तकांचे स्टाॅल,धनगरी लोकरीच्या बिहार राज्यातील कला वस्तू घेऊन आले होते. श्री शिवाजीराव बंडगर सर करमाळा यांनी आणलेले हलगी पथक, अहिल्य शिक्षण संस्थेचे म्हसवड येथील मुलींचे गज न्रुत्य, टिपरी पथक,बेडगनूर सरांचे दोनसे मुला मुलींचे उत्कृष्ट लेझीम पथक , करमाळा धायखिंडीचे पुरूष गज न्रुत्य, सर्व सहभागी कवी, साहित्यिक, सर्व क्षेत्रातील बौद्धीक मान्यवर यांनी संमेलनास दोन दिवस हजेरी लावली,सर्व प्रिंट मिडीया ,सर्व दैनिक यांनी दोन दिवस भरभरून प्रचार प्रसार केला. संमेलन जनमानसात पोहचवण्याचा प्रयत्न केला.महाराष्ट्र राजाच्या काना कोपऱ्यातून बौद्धीक, मंडळी आली होती. त्याच दिवसी मनोज जरांगे पाटील यांचे रस्ता रोको व आमरावती, मुंबई, पुणे येथील वधूवर परिचय मेळावे व सव्वीस तारखेची लग्न तिथ यामुळे बरेच लोक धर्म संकटात आडकले होते. अनेक जण फक्त भेटून गेले, अनेक जण येवू शकले नाहीत. उद्घाटन ते समारोप सर्व कार्यक्रम नियोजीत वेळेत पार पडले. उपस्थित सर्व क्षेत्रातील साहित्यीक, पत्रकार, समाज सेवक यांचे आभार व संयोजकांचे अभिनंदन. पाचव्या ईतिहासा च्या पानावर लेखन,फोटो, वक्तृत्व, कर्त्रुत्व या माध्यमातून आपले सर्वांच्या स्म्रुती कायम ईतिहास जमा राहणार आहेत. आपण आणखी एक ईतिहासाचे पान उलटले.
प्राचार्य डाॅ.अभिमन्यु टकले.
आपले सर्व सहभागी.
—————————-
ऐडव्होकेट, श्री रामहरी रूपनवर अध्यक्ष
प्रा.आर एस चोपडे सर सांगली संमेलन पूर्व अध्यक्ष.
डाॅ.श्रीपाल सबनीस सर,श्री राजा माने वरिष्ठ पत्रकार, श्री दिलीप माने मा.आमदार,
श्री संभाजीराव सुळ उपाध्यक्ष साहित्य संमेलन.
श्री चंद्रकांत हजारे प्रवक्ते आंबेजोगाई.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील.
पूर्व स्वागत अध्यक्ष.
श्री संजय शिंगाडे सर. सांगोला.पूर्व स्वागत अध्यक्ष
श्रीराम हणमंतराव पाटील स्वागत अध्यक्ष.
प्राचार्य श्री कुंडलिक आलदर सर सांगोला,
श्री सिध्दारूड बेडगनूर सर संयोजक सोलापूर. प्रा.देवेंद्र मदने सर,सोलापूर, .
श्री हणमंतराव चौरे शिवसेना जिल्हाप्रमुख सातारा.
श्री उज्ज्वलकुमार माने संपादक, लेखक, सोलापूर.
मा.विष्णु माने नगरसेवक
सांगली.
मा.पाडुंरग रूपनवर सांगली. मा.बळवंतराव खोत सांगली.
मा.प्रवीण वाघमोडे सर, जत.
श्री शिवाजीराव बंडगर सर करमाळा.
ईजिंनियर अकुंश शिंदे सरपंच पोथरे करमाळा.
श्री बाळासाहेब टकले करमाळा,
श्री विनायक काळदाते नाशिक.
श्री अगंद देवकते रासप.
करमाळा.
श्री गणेश पुजारी पत्रकार पुणे.
श्री सलीमभाई पटेल पत्रकार म्हसवड माण,
आमोल पांढरे पत्रकार कोल्हापूर,
श्री पकंज देवकते रासप मंगळवेढा.
श्री रामचंद्र धर्मसाळी सर.
श्री जगदेव बंडगर सोलापूर.
श्री अजिनाथ कोळेकर करमाळा.
श्री सदाशिव व्हनमाने सर सुत्र संचालक.
श्री कुंडलिक आलदर सर सांगोला.
श्री बिलन सिद्ध काळे प्रसिद्धी प्रमुख.
श्री ओंकार बेडगनूर सर सुत्र संचालक सोलापूर,
श्री जगन्नाथ सलगर करमाळा,
डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरू.
डाॅ.श्री श्रीमंत कोकाटे पुणे, श्रीमती शोभाताई पाटील सोलापूर. पंडीत श्री चंद्रकांत बिज्जरगी गुरूजी.विजापूर,
श्री चन्नविर भद्रेश्वर मठ,श्री मारोतराव वाघमोडे कर्जत, सौ रूपाली लंभाते पुणे,श्री बालाजी पेठे नांदेड, प्रा.श्री पगडे सर नांदेड,
श्री संजीवन खांडेकर सर भूम,
श्री रामचंद्र खांडेकर दाजी मोहळ, डाॅ.प्रा.उत्तमराव हुडेंकरी सर,प्राचार्य डाॅ.मधुकर सलगरे सर लातूर, प्रा.डाॅ.संगिता पैकेकरी,प्राचार्य डाॅ.मिराताई शेंडगे, प्रा. डाॅ.महेश मोटे उदगिर, लेखक श्री हरिभाऊ कोळेकर बार्शी, श्री मल्हारी नवले चोराखळे उस्मानाबाद, श्री गोविंद गोरे नांदेड,
श्री निवांत कोळेकर सर सांगली.
श्री विक्रम ढोणै जत,
मा.श्री दिगंबर लवटे बंटी सांगोला,श्री चंद्रकांत कोळेकर सोलापूर,
डाॅ.संदिप हजारे कोल्हापूर, डाॅ.उषा देशमुख सांगोला,श्री रामदास कोकरे सहआयुक्त नगर विकास जिल्हाधिकारी कार्यालय लातूर,श्री नामदेव शिंदे पिसआय उत्तर सोलापूर, श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपीआय ठाणे.मुंबई, श्री नागु विरकर पालघर,
श्री चेतनभाऊ नरूटे शहर अध्यक्ष काँग्रेस पक्ष, श्री बाळासाहेब शेळके नेते दक्षिण सोलापूर, श्री संजय क्षीरसागर नेते मोहोळ,
श्रीमती विजया कोकाटे इंदापूर,
प्राचार्य श्री नजन सर पुणे,श्री जगन्नाथ पैकेकरी, श्री विलास पाटील सोलापूर, श्री सिद्राम वाघमोडे सोलापूर, श्री दाजी वाघमोडे मोहोळ
श्री अकुंश निरमळ बिड.
कु.बेबी खुरने बुलढाणा

READ MORE
Blog

वैभवशाली इतिहास शिकवल्यास परिवर्तन घडेल : डॉ. कोकाटे ५ व्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचा समारोप

सोलापूर : सामाजिक साहित्यिक भान सर्वांनी जपले पाहिजे. साहित्यातून समाज जागृती होते. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर व होळकर परिवाराचा इतिहास शौर्य व धैर्याचा आहे मात्र पाठ्यपुस्तकातून खरा इतिहास शिकवला जात नाही. वैभवशाली इतिहास शिकवल्यास निश्चित परिवर्तन घडेल, असे प्रतिपादन इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केले.

बेलाटी येथे शनिवारी, २४ ते २५ फेब्रुवारी दरम्यान श्री संत सद्गुरू बाळुमामा ट्रस्ट, बेलाटी आयोजित पाचव्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांची उपस्थिती होती.

यावेळी विचारमंचावर संमेलनाचे अध्यक्ष माजी आ. एड. रामहरी रुपनवर , संस्थापक प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले, स्वागत अध्यक्ष श्रीराम पाटील, माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य आर. एस. चोपडे, नगर प्रशासन सह आयुक्त रामदास कोकरे, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रा.शिवाजी बंडगर, कारखान्याचे व्हॉईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर-पाटील, उपाध्यक्ष संभाजी सुळ, सिद्धारूढ बेडगनुर, उज्ज्वलकुमार माने, बिसलसिद्ध काळे, प्रा. देवेंद्र मदने, कुंडलिक आलदर, सांगलीचे विक्रम दानगे, प्रा. शिवाजी बंडगर, अण्णाप्पा सतुबर, अमोल पांढरे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी सिद्धारूढ बेडगनुर यांनी ठरावाचे वाचन केले. त्यास हात उंचावून येळकोट येळकोट जय मल्हार, बाळू मामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करत प्रतिसाद देण्यात आला. सूत्रसंचालन सदाशिव व्हनमाने यांनी केले. ओंकार बेडगनुर व बिसलसिद्ध काळे यांनी आभार मानले.

डॉ. कोकाटे पुढे म्हणाले, समाजाचे भवितव्य हे आमदार, खासदार लोकप्रतिनिधी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच साहित्यिक, लेखक, कवी पाहिजे. साहित्यिक कवी हे जपले पाहिजेत. आजही आरक्षणासाठी लढा द्यावा लागतो. सामाजिक व साहित्यिक भान जपले पाहिजे. प्राचीन काळात ढाल तलवारीची लढाई होती. आता यापुढे शिक्षण घेऊन बुद्धीने लढा द्यावा लागेल. मराठ्यांचा इतिहास १८ पगड जाती आणि बारा बलुतेदारासह रयतेचा आहे. अहिल्यादेवी यांचा शौर्य व औदार्याचा इतिहास आहे. जे लढले नाहीत, पराक्रम केला नाही, तो इतिहास शिकवला जातो. धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. शिक्षणाची गरज आहे. वैभवशाली इतिहास पाठ्यपुस्तक पुस्तकातून शिकवल्यास परिवर्तन घडेल.

छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसे जोडली. राजश्री शाहू महाराजांनी आरक्षणाचा पाया रचला. सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय समता येत नाही, तोपर्यंत आरक्षण गरजेचे आहे. इतिहास समाज जोडण्याचे काम करतो. साहित्यातून समाज जागृती होते. त्यामुळे साहित्यिकांना जपले पाहिजे, असे आवाहन यावेळी डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केले.

चेतन नरोटे म्हणाले, साहित्य संमेलनातून विचारांची देवाण-घेवाण होते. विचार संमेलनातून पुढे येतात. त्यांचे विचार लोकांपर्यंत गेले पाहिजेत. परिवर्तन घडेल. विविध समाजांना आरक्षणाच्या आश्वासन देऊन सामाजिक तेढ निर्माण केले जात आहे. त्यामुळे आहे तेच आरक्षण टिकवणे आता आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संमेलनाचे संस्थापक प्राचार्य डॉ. टकले म्हणाले, संमेलनातून महापुरुषांचे विचार, खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशातून हे पाचवे संमेलन येथे आयोजित केले. यापुढेही अखंडितपणे संमेलन होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संमेलनाचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. रामहरी रुपनवर म्हणाले, धनगर समाज हा शूर लढवय्ये समाज आहे. वैभवशाली इतिहास आहे. मूळ मानव जातीची उत्पत्ती धनगरापासून झाली आहे. आंतरजातीय विवाह गरजेचे आहेत, असे सांगतानाच धनगर समाजाच्या इतिहासाचे विविध दाखले त्यांनी यावेळी दिले.

या संमेलनात विविध आठ ठराव करण्यात आले. त्यास हात उंचावून मंजूरी देण्यात आली. यामध्ये धनगर समाजाच्या अनुसुचीत जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी. यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी २ हजार कोटी पर्यंत निधी देण्यात यावा. धनगर मेंढ्यापालासाठी संरक्षण व हक्क कायदा करावा. संत बाळूमामा विचाराचे अध्यापन छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सुरु करावे. धनगर समाजाला आदिवासीच्या सर्व सवलती लागू कराव्यात. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र संस्थेची निर्मिती करावी. धनगर समाजाला लागु असलेली क्रिमिलअरची अट रद्द करावी. आदिवासी धनगर साहित्य संमलेन आणि धनगर धर्मपीठ यांना शासकिय निधी मिळावा आदी ठराव संमत करण्यात आले

READ MORE
Blog

पाचवे आदिवासी धनघर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य | 5ನೇಆದಿವಾಸಿ ಧನಗರ ಸಾಹಿತ್ಯ ಸಮ್ಮೇಳನ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರರಾಜ್ಯ

नमस्कार मित्रांनो,….
“हलुमाता धर्म” YouTube चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे.
या चॅनेलमध्ये आम्ही हलुमत धर्माच्या चालीरीती, संस्कृती, संस्कार, वारसा, इतिहास, साहित्य, हलुमत कला आणि विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या व्यक्ती, हलुमत धार्मिक क्षेत्राची ओळख करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत. हलुमत (कुरुबा) चे गतवैभव पुनर्संचयित करण्याच्या उद्देशाने हे आहे.
“हलुमाता धर्म” नावाचे चॅनल तुमच्या समोर आहे, SUBSCRIBE, LIKE, SHARE करायला विसरू नका, तुमचा पाठिंबा दर्शवा आणि हलुमाता धर्माच्या प्रचारासाठी मदत करा.
जय हलुमाता.

ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರರೆ,….
“Halumata dharma” ಯೂ ಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್‌ಗೆ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಆತ್ಮೀಯ ಸ್ವಾಗತ.
ಈ ಚಾನಲ್‌ನಲ್ಲಿ ನಿಮಗಾಗಿ ಹಾಲುಮತ ಧರ್ಮದ ಅಚಾರ-ವಿಚಾರ, ಸಂಸ್ಕೃತಿ, ಸಂಸ್ಕಾರ, ಪರಂಪರೆ, ಇತಿಹಾಸ, ಸಾಹಿತ್ಯ, ಹಾಲುಮತ ಕಲೆ ಮತ್ತು ವಿವಿಧ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಾಧನೆಗೈದ ವ್ಯಕ್ತಿಗಳು, ಹಾಲುಮತ ಧಾರ್ಮಿಕ ಕ್ಷೇತ್ರಗಳನ್ನು ಪರಿಚಯಿಸುವ ಸಣ್ಣಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಇದರಿಂದ ಹಾಲುಮತದ(ಕುರುಬ) ಹಿಂದಿನ ಗತವೈಭವವವನ್ನು ಮರುಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ
“ಹಾಲುಮತ ಧರ್ಮ” ಎಂಬ ಚಾನಲ್ ನಿಮ್ಮ ಮುಂದಿದೆ ತಾವು ಇದಕ್ಕೆ ಮರೆಯದೆ SUBSCRIBE ಆಗಿ LIKE ನೀಡಿ SHARE ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಬೆಂಬಲ ಸೂಚಿಸಿ ಹಾಲುಮತ ಧರ್ಮ ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ಸಹಕರಿಸಿರಿ.
ಜೈ ಹಾಲುಮತ.

READ MORE
Blog

आदिवासी धनगर साहित्य संमेलनासंदर्भात, आयोजित केलेल्या पत्रकार परिषद

पुण्यश्लोक, लोकमाता – राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक, विजयनगर – सांगली येथे, आदिवासी धनगर साहित्य संमेलनासंदर्भात, आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस संबोधित करताना संमेलनाचे अध्यक्ष, मा. ॲड. श्री. रामहरी रुपनवर साहेब, 4 थ्या
आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, मा. प्राचार्य, श्री. आर. एस. चोपडे सर, संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष, मा. डॉ. श्री. अभिमन्यू टकले, सांगली – मिरज – कुपवाड महानगरपालिकेचे नगरसेवक, मा. श्री. विष्णू माने, उद्योजक मा. श्री. पांडुरंग रुपनर, समाजाचे नेते मा. श्री. बळवंत खोत, सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. उत्तमराव जानकर, माजी जिल्हा परिषद सदस्य, मा. श्री. वाघमोडे सर, मा. ॲड. श्री. सिद्धू ओलेकर, मा. श्री. स्वप्निल बंडगर, मा. श्री. लूनेश वीरकर सर आणि प्रसिद्धी व जनसंपर्क विभागप्रमुख, मा. श्री. अमोल पांढरे आदी…

READ MORE
Blog

5 व्या, आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे “राज्य स्तरीय पुरस्कार” जाहीर…

ख्यातनामं साहित्यिक मा. श्री. संजय सोनवणी यांच्यासह 12 जणांचा होणार सन्मानं, 24, 25 फेब्रवारीला बेलाटी येथिल संत बाळूमामा मंदीरात होणार संमेलनं…🌹

सोलापूर, आदिवासी धनगर साहित्य संमेलनामार्फत दरवर्षी दिल्या जाणा-या अत्यंत प्रतिष्ठित अशा राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या पदाधि-का-यांनी आयोजित केलेल्या बैठकीत या सर्व नावांच्यावर चर्चा होवून सर्वानुमते या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्यामध्ये समाजातील सर्व स्तरांतील गुणवंतांचा समावेश आहे. ख्यातनामं साहित्यिक संजय सोनवणी यांच्यासह सामाजिक, राजकीय, सांस्कृतीक, पत्रकारिता, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित केले जाणार आहे. हे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत…

🌹 1) मा. श्री. संजय सोनवणी, पुणे, प्राख्यात साहित्यिक तथा इतिहास संशोधक
पुरस्कार – पुण्यश्लोक, लोकमाता- राजमाता अहिल्यादेवी होळकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार
कार्य – साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य, पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संमेलनं अध्यक्ष, राष्ट्रीय स्तरावरील वाहिनीवरुन प्रसारित होणा-या, पु्ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सोनेरी इतिहासावरील मालीकेचे लिखाणं, त्याशिवाय होळकराशाहीवरील अनेक पुस्तकांचे लेखणं
🌹2) मा. श्री. सोमनाथ तुकाराम कर्णवर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ‘नारपोली पोलीस स्टेशनं भिवंडी, ठाणे शहर
पुरस्काराचे नावं – महाराजे यशवंतराव होळकर समाजरत्नं पुरस्कार
कार्य – श्री. सोमनाथ कर्णवर पाटील यांनी माळशिरस येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आपल्या भागातील सर्व अधिकारी वर्गास एकत्र करुन, स्पर्धा परिक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षा अकादमी सुरू करण्यात मोलाचे योगदानं दिले आहे.
🌹3) मा. प्रा. श्री. शिवाजीराव बंडगर सर, माजी सभापती, बाजार समिती करमाळा, जि. सोलापूर
पुरस्कार – थोरले सुभेदार मल्हाराव होळकर समाजभूषणं पुरस्कार
कार्य – धनगर आरक्षणं चळवळ, सोलापूर विद्यापीठ नामांतर लढा, उजनी धरणंग्रस्त शेतकरी अन्याय निवारणं समिती अशा विविध चळवळीत महत्वपूर्ण भूमीका
🌹4) मा. श्री. बाळासाहेब कोपनर, डी. वाय. एस. पी, पिंपरी चिंचवड, पुणे
पुरस्कार – थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, सर्वोत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार
कार्य – प्रशासकीय सेवेत राहूनही उत्कृष्ट समाजसेवा आणि सामाजिक कार्य
🌹5) मा. श्री. रामदास कोकरे, सहआयुक्त, नगर विकास, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर
पुरस्कार – पुण्यश्लोक, अहिल्यादेवी होळकर उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी
कार्य – शहरी कचरा व्यवस्थापनं पॅटर्न महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध, उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणूनं ख्याती
🌹6) मा. डॉ. सौ. उषा देशमुख, सांगोला,
पुरस्कार – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्कृष्ट वैद्यकीय शिकण सेवा पुरस्कार
कार्य – सर्व साहित्य संमेलनात सक्रिय सहभाग, अनेक शासकीय समित्यांवर सदस्य म्हणून उत्कृष्ट कार्य, विविध आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून उल्लेखनीय सेवा, तसेच महिला आणि बालकल्याणं क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी
🌹7) मा. श्री. बिपीनंभाई पटेल, कार्यकारी विश्वस्त, एम.एम.पटेल, ट्रस्ट सोलापूर
पुरस्कार – पुण्यश्लोक, अहिल्यादेवी होळकर सोलापूरभूषणं पुरस्कार
कार्य – एम. एम. पटेल ट्रस्टमार्फत सोलापूर जिल्ह्यातील एकमेव खासगी वैद्यकीय महाविद्यालय चालविणे, बी. एस्सी. नर्सिंग महाविद्यालय, जि. एन. एम., पँरामेडिकलसारखे शिक्षण सुरू करणे, अश्विनी रुग्णालयामार्फत वैद्यकीय सेवा
🌹8)श्री रामचंद्र खांडेकर दाजी ता.मोहळ जि.सोलापूर.
पुरस्कार: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाज रत्न पुरस्कार.
कार्य: सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्य, अनेक नेते घडवण्याचे कार्य यांनी केले आहे. ५० वर्ष झाले दाजी निरपेक्ष पने कार्य करत आहेत.
🌹9) मा. प्रा. डॉ. श्री. एन. जी. काळे, इंदौर, इतिहास संशोधक,
पुरस्कार – कवीवर्य संत कालीदास जिवनं गौरव पुरस्कार
कार्य – सिद्दहस्त लेखक, साहित्यिक, अनेक पुस्तकांचे लेखनं
🌹10) मा. श्री. नागू विरकर, केंद्र प्रमुख, जिल्ह परिषद, पालघर
पुरस्कार – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साहित्यरत्नं पुरस्कार
कार्य – धनगरी जिवनावर हेडामं नावाची सुप्रसिद्द कांदबरी
🌹11 ) मा. श्री. शेखर बंगाळे, सामाजिक कार्यकर्ता
पुरस्कार – महाराजे यशवंतराव होळकर आदर्श कार्यकर्ता पुरस्कारकार्य – समाजहितासाठी सदैव आग्रही, विविध आंदोलनात सक्रीय सहभाग, आक्रमक कार्यकर्ता
🌹12) मा. श्री. सलीमभाई आदमभाई पटेल, ( म्हसवड ) पत्रकार
कार्य – समाजाच्या वविध प्रश्नांना वाचा फोडली, पत्रकारितेच्या माध्यमातून गोरगरीब आणि तळागाळातील घटकांना नेहमी सहकार्य केले.
पुरस्कार – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
१३)डाॅ.संदिप हजारे कोल्हापूर,
पुरस्कार;शूर वीर क्रांतीरत्न विठोजीराजे होळकर समाज भूषण.
कार्य: वैद्यकीय सेवा, कोल्हापूरात राज्य स्तरीय महाराजा यशवंतराव होळकर जयंती, समाज सेवा.

पाचवे, आदिवासी धनगर साहित्य संमेलन हे शनिवार दिनांक 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी, श्री. संत. सदगुरू बाळुमामा मंदिर, विजयपूर, बायपास रोड, मु. पो. बेलाटी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर येथे होत आहे. आणि याच साहित्य संमेलनात वरील सर्व मान्यवरांना, गुणवंतांना, महाराष्ट्रातील आणि देशभरातील जनतेच्या व समाजाच्या वतीने सन्मानित केले जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप, शाल, श्रीफळ, मानाचा फेटा, धनगरी काठी अन् घोंगडे, सन्मान पत्र व सन्मान चिन्हं असे आहे. जे मान्यवर उल्लेखनीय सेवा करतात त्यांचा गौरव व सन्मान व्हावा आणि नवोदितांनाही प्रोत्साहन मिळावे. हा या उपक्रमाचा हेतू आहे.

सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी याबद्दल आदिवासी धनगर साहित्य संमेलनं या विचारपीठाचे आभार मानले आहेत. तर पुरस्कर जाहीर झाल्यानंतर संबंधित मान्यवरांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डाॅ.अभिमन्यु टकले
संस्थापक आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.

READ MORE