Blog

वैभवशाली इतिहास शिकवल्यास परिवर्तन घडेल : डॉ. कोकाटे ५ व्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचा समारोप

सोलापूर : सामाजिक साहित्यिक भान सर्वांनी जपले पाहिजे. साहित्यातून समाज जागृती होते. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर व होळकर परिवाराचा इतिहास शौर्य व धैर्याचा आहे मात्र पाठ्यपुस्तकातून खरा इतिहास शिकवला जात नाही. वैभवशाली इतिहास शिकवल्यास निश्चित परिवर्तन घडेल, असे प्रतिपादन इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केले.

बेलाटी येथे शनिवारी, २४ ते २५ फेब्रुवारी दरम्यान श्री संत सद्गुरू बाळुमामा ट्रस्ट, बेलाटी आयोजित पाचव्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांची उपस्थिती होती.

यावेळी विचारमंचावर संमेलनाचे अध्यक्ष माजी आ. एड. रामहरी रुपनवर , संस्थापक प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले, स्वागत अध्यक्ष श्रीराम पाटील, माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य आर. एस. चोपडे, नगर प्रशासन सह आयुक्त रामदास कोकरे, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रा.शिवाजी बंडगर, कारखान्याचे व्हॉईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर-पाटील, उपाध्यक्ष संभाजी सुळ, सिद्धारूढ बेडगनुर, उज्ज्वलकुमार माने, बिसलसिद्ध काळे, प्रा. देवेंद्र मदने, कुंडलिक आलदर, सांगलीचे विक्रम दानगे, प्रा. शिवाजी बंडगर, अण्णाप्पा सतुबर, अमोल पांढरे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी सिद्धारूढ बेडगनुर यांनी ठरावाचे वाचन केले. त्यास हात उंचावून येळकोट येळकोट जय मल्हार, बाळू मामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करत प्रतिसाद देण्यात आला. सूत्रसंचालन सदाशिव व्हनमाने यांनी केले. ओंकार बेडगनुर व बिसलसिद्ध काळे यांनी आभार मानले.

डॉ. कोकाटे पुढे म्हणाले, समाजाचे भवितव्य हे आमदार, खासदार लोकप्रतिनिधी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच साहित्यिक, लेखक, कवी पाहिजे. साहित्यिक कवी हे जपले पाहिजेत. आजही आरक्षणासाठी लढा द्यावा लागतो. सामाजिक व साहित्यिक भान जपले पाहिजे. प्राचीन काळात ढाल तलवारीची लढाई होती. आता यापुढे शिक्षण घेऊन बुद्धीने लढा द्यावा लागेल. मराठ्यांचा इतिहास १८ पगड जाती आणि बारा बलुतेदारासह रयतेचा आहे. अहिल्यादेवी यांचा शौर्य व औदार्याचा इतिहास आहे. जे लढले नाहीत, पराक्रम केला नाही, तो इतिहास शिकवला जातो. धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. शिक्षणाची गरज आहे. वैभवशाली इतिहास पाठ्यपुस्तक पुस्तकातून शिकवल्यास परिवर्तन घडेल.

छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसे जोडली. राजश्री शाहू महाराजांनी आरक्षणाचा पाया रचला. सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय समता येत नाही, तोपर्यंत आरक्षण गरजेचे आहे. इतिहास समाज जोडण्याचे काम करतो. साहित्यातून समाज जागृती होते. त्यामुळे साहित्यिकांना जपले पाहिजे, असे आवाहन यावेळी डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केले.

चेतन नरोटे म्हणाले, साहित्य संमेलनातून विचारांची देवाण-घेवाण होते. विचार संमेलनातून पुढे येतात. त्यांचे विचार लोकांपर्यंत गेले पाहिजेत. परिवर्तन घडेल. विविध समाजांना आरक्षणाच्या आश्वासन देऊन सामाजिक तेढ निर्माण केले जात आहे. त्यामुळे आहे तेच आरक्षण टिकवणे आता आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संमेलनाचे संस्थापक प्राचार्य डॉ. टकले म्हणाले, संमेलनातून महापुरुषांचे विचार, खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशातून हे पाचवे संमेलन येथे आयोजित केले. यापुढेही अखंडितपणे संमेलन होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संमेलनाचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. रामहरी रुपनवर म्हणाले, धनगर समाज हा शूर लढवय्ये समाज आहे. वैभवशाली इतिहास आहे. मूळ मानव जातीची उत्पत्ती धनगरापासून झाली आहे. आंतरजातीय विवाह गरजेचे आहेत, असे सांगतानाच धनगर समाजाच्या इतिहासाचे विविध दाखले त्यांनी यावेळी दिले.

या संमेलनात विविध आठ ठराव करण्यात आले. त्यास हात उंचावून मंजूरी देण्यात आली. यामध्ये धनगर समाजाच्या अनुसुचीत जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी. यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी २ हजार कोटी पर्यंत निधी देण्यात यावा. धनगर मेंढ्यापालासाठी संरक्षण व हक्क कायदा करावा. संत बाळूमामा विचाराचे अध्यापन छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सुरु करावे. धनगर समाजाला आदिवासीच्या सर्व सवलती लागू कराव्यात. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र संस्थेची निर्मिती करावी. धनगर समाजाला लागु असलेली क्रिमिलअरची अट रद्द करावी. आदिवासी धनगर साहित्य संमलेन आणि धनगर धर्मपीठ यांना शासकिय निधी मिळावा आदी ठराव संमत करण्यात आले

READ MORE
Blog

पाचवे आदिवासी धनघर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य | 5ನೇಆದಿವಾಸಿ ಧನಗರ ಸಾಹಿತ್ಯ ಸಮ್ಮೇಳನ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರರಾಜ್ಯ

नमस्कार मित्रांनो,….
“हलुमाता धर्म” YouTube चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे.
या चॅनेलमध्ये आम्ही हलुमत धर्माच्या चालीरीती, संस्कृती, संस्कार, वारसा, इतिहास, साहित्य, हलुमत कला आणि विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या व्यक्ती, हलुमत धार्मिक क्षेत्राची ओळख करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत. हलुमत (कुरुबा) चे गतवैभव पुनर्संचयित करण्याच्या उद्देशाने हे आहे.
“हलुमाता धर्म” नावाचे चॅनल तुमच्या समोर आहे, SUBSCRIBE, LIKE, SHARE करायला विसरू नका, तुमचा पाठिंबा दर्शवा आणि हलुमाता धर्माच्या प्रचारासाठी मदत करा.
जय हलुमाता.

ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರರೆ,….
“Halumata dharma” ಯೂ ಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್‌ಗೆ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಆತ್ಮೀಯ ಸ್ವಾಗತ.
ಈ ಚಾನಲ್‌ನಲ್ಲಿ ನಿಮಗಾಗಿ ಹಾಲುಮತ ಧರ್ಮದ ಅಚಾರ-ವಿಚಾರ, ಸಂಸ್ಕೃತಿ, ಸಂಸ್ಕಾರ, ಪರಂಪರೆ, ಇತಿಹಾಸ, ಸಾಹಿತ್ಯ, ಹಾಲುಮತ ಕಲೆ ಮತ್ತು ವಿವಿಧ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಾಧನೆಗೈದ ವ್ಯಕ್ತಿಗಳು, ಹಾಲುಮತ ಧಾರ್ಮಿಕ ಕ್ಷೇತ್ರಗಳನ್ನು ಪರಿಚಯಿಸುವ ಸಣ್ಣಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಇದರಿಂದ ಹಾಲುಮತದ(ಕುರುಬ) ಹಿಂದಿನ ಗತವೈಭವವವನ್ನು ಮರುಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ
“ಹಾಲುಮತ ಧರ್ಮ” ಎಂಬ ಚಾನಲ್ ನಿಮ್ಮ ಮುಂದಿದೆ ತಾವು ಇದಕ್ಕೆ ಮರೆಯದೆ SUBSCRIBE ಆಗಿ LIKE ನೀಡಿ SHARE ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಬೆಂಬಲ ಸೂಚಿಸಿ ಹಾಲುಮತ ಧರ್ಮ ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ಸಹಕರಿಸಿರಿ.
ಜೈ ಹಾಲುಮತ.

READ MORE
Blog

आदिवासी धनगर साहित्य संमेलनासंदर्भात, आयोजित केलेल्या पत्रकार परिषद

पुण्यश्लोक, लोकमाता – राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक, विजयनगर – सांगली येथे, आदिवासी धनगर साहित्य संमेलनासंदर्भात, आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस संबोधित करताना संमेलनाचे अध्यक्ष, मा. ॲड. श्री. रामहरी रुपनवर साहेब, 4 थ्या
आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, मा. प्राचार्य, श्री. आर. एस. चोपडे सर, संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष, मा. डॉ. श्री. अभिमन्यू टकले, सांगली – मिरज – कुपवाड महानगरपालिकेचे नगरसेवक, मा. श्री. विष्णू माने, उद्योजक मा. श्री. पांडुरंग रुपनर, समाजाचे नेते मा. श्री. बळवंत खोत, सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. उत्तमराव जानकर, माजी जिल्हा परिषद सदस्य, मा. श्री. वाघमोडे सर, मा. ॲड. श्री. सिद्धू ओलेकर, मा. श्री. स्वप्निल बंडगर, मा. श्री. लूनेश वीरकर सर आणि प्रसिद्धी व जनसंपर्क विभागप्रमुख, मा. श्री. अमोल पांढरे आदी…

READ MORE
Blog

5 व्या, आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे “राज्य स्तरीय पुरस्कार” जाहीर…

ख्यातनामं साहित्यिक मा. श्री. संजय सोनवणी यांच्यासह 12 जणांचा होणार सन्मानं, 24, 25 फेब्रवारीला बेलाटी येथिल संत बाळूमामा मंदीरात होणार संमेलनं…🌹

सोलापूर, आदिवासी धनगर साहित्य संमेलनामार्फत दरवर्षी दिल्या जाणा-या अत्यंत प्रतिष्ठित अशा राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या पदाधि-का-यांनी आयोजित केलेल्या बैठकीत या सर्व नावांच्यावर चर्चा होवून सर्वानुमते या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्यामध्ये समाजातील सर्व स्तरांतील गुणवंतांचा समावेश आहे. ख्यातनामं साहित्यिक संजय सोनवणी यांच्यासह सामाजिक, राजकीय, सांस्कृतीक, पत्रकारिता, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित केले जाणार आहे. हे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत…

🌹 1) मा. श्री. संजय सोनवणी, पुणे, प्राख्यात साहित्यिक तथा इतिहास संशोधक
पुरस्कार – पुण्यश्लोक, लोकमाता- राजमाता अहिल्यादेवी होळकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार
कार्य – साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य, पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संमेलनं अध्यक्ष, राष्ट्रीय स्तरावरील वाहिनीवरुन प्रसारित होणा-या, पु्ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सोनेरी इतिहासावरील मालीकेचे लिखाणं, त्याशिवाय होळकराशाहीवरील अनेक पुस्तकांचे लेखणं
🌹2) मा. श्री. सोमनाथ तुकाराम कर्णवर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ‘नारपोली पोलीस स्टेशनं भिवंडी, ठाणे शहर
पुरस्काराचे नावं – महाराजे यशवंतराव होळकर समाजरत्नं पुरस्कार
कार्य – श्री. सोमनाथ कर्णवर पाटील यांनी माळशिरस येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आपल्या भागातील सर्व अधिकारी वर्गास एकत्र करुन, स्पर्धा परिक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षा अकादमी सुरू करण्यात मोलाचे योगदानं दिले आहे.
🌹3) मा. प्रा. श्री. शिवाजीराव बंडगर सर, माजी सभापती, बाजार समिती करमाळा, जि. सोलापूर
पुरस्कार – थोरले सुभेदार मल्हाराव होळकर समाजभूषणं पुरस्कार
कार्य – धनगर आरक्षणं चळवळ, सोलापूर विद्यापीठ नामांतर लढा, उजनी धरणंग्रस्त शेतकरी अन्याय निवारणं समिती अशा विविध चळवळीत महत्वपूर्ण भूमीका
🌹4) मा. श्री. बाळासाहेब कोपनर, डी. वाय. एस. पी, पिंपरी चिंचवड, पुणे
पुरस्कार – थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, सर्वोत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार
कार्य – प्रशासकीय सेवेत राहूनही उत्कृष्ट समाजसेवा आणि सामाजिक कार्य
🌹5) मा. श्री. रामदास कोकरे, सहआयुक्त, नगर विकास, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर
पुरस्कार – पुण्यश्लोक, अहिल्यादेवी होळकर उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी
कार्य – शहरी कचरा व्यवस्थापनं पॅटर्न महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध, उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणूनं ख्याती
🌹6) मा. डॉ. सौ. उषा देशमुख, सांगोला,
पुरस्कार – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्कृष्ट वैद्यकीय शिकण सेवा पुरस्कार
कार्य – सर्व साहित्य संमेलनात सक्रिय सहभाग, अनेक शासकीय समित्यांवर सदस्य म्हणून उत्कृष्ट कार्य, विविध आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून उल्लेखनीय सेवा, तसेच महिला आणि बालकल्याणं क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी
🌹7) मा. श्री. बिपीनंभाई पटेल, कार्यकारी विश्वस्त, एम.एम.पटेल, ट्रस्ट सोलापूर
पुरस्कार – पुण्यश्लोक, अहिल्यादेवी होळकर सोलापूरभूषणं पुरस्कार
कार्य – एम. एम. पटेल ट्रस्टमार्फत सोलापूर जिल्ह्यातील एकमेव खासगी वैद्यकीय महाविद्यालय चालविणे, बी. एस्सी. नर्सिंग महाविद्यालय, जि. एन. एम., पँरामेडिकलसारखे शिक्षण सुरू करणे, अश्विनी रुग्णालयामार्फत वैद्यकीय सेवा
🌹8)श्री रामचंद्र खांडेकर दाजी ता.मोहळ जि.सोलापूर.
पुरस्कार: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाज रत्न पुरस्कार.
कार्य: सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्य, अनेक नेते घडवण्याचे कार्य यांनी केले आहे. ५० वर्ष झाले दाजी निरपेक्ष पने कार्य करत आहेत.
🌹9) मा. प्रा. डॉ. श्री. एन. जी. काळे, इंदौर, इतिहास संशोधक,
पुरस्कार – कवीवर्य संत कालीदास जिवनं गौरव पुरस्कार
कार्य – सिद्दहस्त लेखक, साहित्यिक, अनेक पुस्तकांचे लेखनं
🌹10) मा. श्री. नागू विरकर, केंद्र प्रमुख, जिल्ह परिषद, पालघर
पुरस्कार – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साहित्यरत्नं पुरस्कार
कार्य – धनगरी जिवनावर हेडामं नावाची सुप्रसिद्द कांदबरी
🌹11 ) मा. श्री. शेखर बंगाळे, सामाजिक कार्यकर्ता
पुरस्कार – महाराजे यशवंतराव होळकर आदर्श कार्यकर्ता पुरस्कारकार्य – समाजहितासाठी सदैव आग्रही, विविध आंदोलनात सक्रीय सहभाग, आक्रमक कार्यकर्ता
🌹12) मा. श्री. सलीमभाई आदमभाई पटेल, ( म्हसवड ) पत्रकार
कार्य – समाजाच्या वविध प्रश्नांना वाचा फोडली, पत्रकारितेच्या माध्यमातून गोरगरीब आणि तळागाळातील घटकांना नेहमी सहकार्य केले.
पुरस्कार – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
१३)डाॅ.संदिप हजारे कोल्हापूर,
पुरस्कार;शूर वीर क्रांतीरत्न विठोजीराजे होळकर समाज भूषण.
कार्य: वैद्यकीय सेवा, कोल्हापूरात राज्य स्तरीय महाराजा यशवंतराव होळकर जयंती, समाज सेवा.

पाचवे, आदिवासी धनगर साहित्य संमेलन हे शनिवार दिनांक 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी, श्री. संत. सदगुरू बाळुमामा मंदिर, विजयपूर, बायपास रोड, मु. पो. बेलाटी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर येथे होत आहे. आणि याच साहित्य संमेलनात वरील सर्व मान्यवरांना, गुणवंतांना, महाराष्ट्रातील आणि देशभरातील जनतेच्या व समाजाच्या वतीने सन्मानित केले जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप, शाल, श्रीफळ, मानाचा फेटा, धनगरी काठी अन् घोंगडे, सन्मान पत्र व सन्मान चिन्हं असे आहे. जे मान्यवर उल्लेखनीय सेवा करतात त्यांचा गौरव व सन्मान व्हावा आणि नवोदितांनाही प्रोत्साहन मिळावे. हा या उपक्रमाचा हेतू आहे.

सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी याबद्दल आदिवासी धनगर साहित्य संमेलनं या विचारपीठाचे आभार मानले आहेत. तर पुरस्कर जाहीर झाल्यानंतर संबंधित मान्यवरांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डाॅ.अभिमन्यु टकले
संस्थापक आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.

READ MORE
Blog

५ वे आदिवासी धनगर साहित्य संमेलन बेलाटी येथे होणार

 

पाचवी आदिवासी धनगर साहित्य संमेलन सोलापूर येथील बेलाटी या ठिकाणी होत आहे त्यासंदर्भात संस्थापक अध्यक्ष अभिमन्यू टकले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

 

READ MORE
Blog

5 व्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, मा. ॲड. श्री. रामहरी रुपनवर (आप्पा) यांचा अल्प परिचय…!

सोलापूर, दिनांक ( अमोल पांढरे, याजकडून ) 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी, सोलापूर जिल्ह्यातल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील “बेलाटी” येथे होणाऱ्या, 5 व्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी, माजी आमदार तथा ज्येष्ठ साहित्यिक, मा. अँड. श्री. रामहरी रुपनवर यांची निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरती त्यांच्या कार्याचा आढावा आणि त्यांचा अल्प परिचय उपलब्ध करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न…

एक हसतमुख, सोज्वळ, जिद्दी, मनमिळाऊ आणि लढावू व्यक्तिमत्व म्हणून आमदार, मा. ॲड. श्री. रामहरी रुपनवर यांची सर्वत्र ओळख आहे. महाराष्ट्रातील सर्व जनता त्यांना प्रेमाने आप्पा म्हणून संबोधते. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील एकशिव या गावी निरा नदीच्या काठावरील एका खेडेगावात झाला. वडील लहानपणीच गेल्यामुळे कुटुंबाची आर्थिक जबाबदारी त्यांच्यावरती येवून पडली. ही जबाबदारी पेलत असताना त्यांना शेतीत काबाड-कष्ट करावे लागले. तसेच अकलूज येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरीही करावी लागली. आणि ही नोकरी करीत करीतच त्यांनी बी.कॉम (ऑनर्स) व त्यानंतर एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन, त्यांनी माळशिरसच्या न्यायालयात वकिली व्यवसायिक सुरू केला. वकिली व्यवसाय करीत असताना ते एकशिव ग्रामपंचायतचे सदस्य म्हणूनही निवडून आले. तेथेही त्यांनी दहा वर्षे काम केले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही ते सलग दहा वर्ष निवडून आले. आणि सर्वसामान्यांसाठी झपाटून काम केले. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार म्हणून कामकाज करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी अधिवेशनं असो की सभागृहातील चर्चा विविध प्रश्नांच्यावरती आवाज उठविला. आणि सर्वसामान्य जनतेसह समाजाचे अनेक प्रश्न तसेच विविध योजनाही मार्गी लावल्या. त्याबरोबरच शासनाच्या विविध धोरणात्मक निर्णयामध्येही त्यांनी भाग घेतला अनेक धोरणं ठरवली आणि अमलातही आणली. ज्या शासनाच्या विविध योजना होत्या त्या अंमलात आणून सर्वसामान्यांचे जिवनं सुखी करण्याचा प्रयत्नं केला. त्याशिवाय या काळात त्यांनी दूध संघ, पतसंस्था, शिक्षण संस्था, ट्रस्ट आणि विविध कंपन्यांची निर्मिती करण्यातही त्यांनी मोलाचे योगदानं दिले.

नेहमीचं सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने रुपनवर आप्पा यांनी यशाची अनेक शिखरे गाठली. प्रचंड साहित्यनिर्मीती केली. विविध विषयांवरती व्याख्याने दिली. समाजासोबत अखंड संवाद साधण्याचे त्यांचे कसबं वाखाणण्यासारखे आहे. हे कार्य आजही सुरूच आहे. अनेकवेळा त्यांनी अभ्यासासाठी विदेशदौरेही केले आहेत. लहानपणापासूनच वारकरी सांप्रदायाची शिकवण लाभल्याने ते पूर्णपणे शाकाहारी आणि निर्व्यसनी आहेत. वाचनाची, भाषणाची त्यांना प्रचंड आवड आहे. अनेक थोरा – मोठ्यांचा सहवास त्यांना लाभला. ही त्यांच्या जिवनात जमेची बाजू राहिली आहे. परिणामी ते यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावरती पोहोचले आहेत. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊनच, आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.


त्यांच्याविषयी अगदी थोडक्यात…✍️🌹

नाव – अँड. रामहरी गोविंदराव रुपनर

जन्म – दिनांक 1 जून 1956

शिक्षण – बी.कॉम (ऑनर्स) एल.एल.बी

पत्ता – मु. पो. नातेपुते (पालखी मैदान) तालुका – माळशिरस, जिल्हा – सोलापूर

मोबाईल नंबर – 99 22 96 89 26, 98 34 88 30 36

– माजी सदस्य – महाराष्ट्र विधान परिषद

– सरचिटणीस – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

– प्रशिक्षण – प्रशिक्षणप्रमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

– अध्यक्ष – महाराष्ट्र धनगर समाज महासंघ

– चेअरमन – श्रीराम शेती दुग्ध प्रक्रिया लिमिटेड, नातेपुते

– अध्यक्ष – ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ एकशिव

– अध्यक्ष – निरा कालवा, पाणी वाटप संस्था एकशिव

– अध्यक्ष – जय मल्हार कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठानं, एकशिव

– अध्यक्ष – रामहरी रुपनवर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नातेपुते

– सदस्य – पंचायत राज समिती, विधानमंडळ मुंबई

📜✒️🌹राजकीय व सामाजिक कार्य 🌹

– संघटक – सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी

– सदस्य – जिल्हा परिषद, सोलापूर 10 वर्षे (1997 ते 2007)

– संचालक – महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मर्यादित, पुणे

– चेअरमन – एकशिव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, दहा वर्ष (1988 ते 1998) सरचिटणीस – महाराष्ट्र धनगर समाज महासंघ

– संचालक – महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ, धुळे

– संस्थापक अध्यक्ष – सिद्धनाथ ग्रामीण सहकारी पतसंस्था, एकशिव

– अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कर्मचारी युनियन

– अध्यक्ष – 44 फाटा शेतकरी अन्याय निवारण कृती समिती, नातेपुते

– सदस्य – जिल्हा शिक्षण सल्लागार समिती, सोलापूर

– सदस्य – ग्रामपंचायत एकशिव 10 वर्षे (1989 ते 2000)

– सदस्य – बांधकाम समिती, जिल्हा परिषद, सोलापूर

– सिनेट सदस्य – सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे

📜✒️🌹 उल्लेखनिय सामाजिक कार्य – 🌹

– ४४ फाटा बारमाही पाणी योजनेसाठी संघर्ष करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.

– ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनाही न्याय मिळवून दिला.

– बी.सी. आणि ओबीसी समाजासाठी जमीन मिळावी यासाठी संघर्ष केला.

– महाराष्ट्रात अहिल्या संदेश यात्रेचे आयोजनं

– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर एका पोवाड्याची रचना केली.

– राजकारण, समाजकारण तसेच पारमार्थिक विषयावरती अनेक व्याख्यानें दिली…

अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाची, म्हणजेच रुपनर आप्पा यांच्या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा चंग, आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या टीमने बांधला होता. म्हणून तर संमेलनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आप्पांची भेट घेऊन त्यांना या संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली असता, त्यांनी सर्वांच्या विनंतीला मानं देवून, हे अध्यक्षपद स्वीकारले आहे. याबद्दल सकल महाराष्ट्रातील धनगर-ओबीसी आणि बहुजन समाजबांधवांच्याकडून तसेच महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेकडून, साहित्यिक, लेखक, विचारवंत, कवी, इतिहासतज्ञ, इतिहास संशोधक, इतिहासाचे अभ्यासक या आणि अशा सर्वच घटकातून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

📜✒️🔥🌹🌹🌹

या साहित्य संमेलनाला आपण यायला विसरायचं नाही.

🔥दिनांक – 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी…

वेळ – सकाळी 8 वाजल्यापासून…

📜✒️ स्थळ – संत सद्गुरू बाळुमामा मंदिर, विजयपूर बायपास रोड, बेलाटी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर

आपले विनीत 🙏📜✒️🌹- आदिवासी धनगर साहित्य संमेलन, संयोजन समिती, सोलापूर

READ MORE
Blog

पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन

सोलापूर दिनांक.१२|०२|२०२४ रोजी मा.मनिषा आव्हाळे मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हापरिषद यांना आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य बेलाटी निमंत्रण दिले, मी येणारच आहे असे त्यांनी सांगितले. मा.कुमार आशिर्वाद जिलाहाधिकारी सोलापूर यांनाही निमंत्रण देण्यात आले ते म्हणाले निवडणूकीचे खूप काम आहे मी प्रयत्न करतो.

श्री महादेव जानकर आमदार यांना अध्यक्ष श्री रामहरी रूपनवर माजी आमदार लेखक व वक्ते व श्रीराम हणमंतराव पाटील बेलाटीकर स्वागताध्यक्ष यांनी साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिल्यानंतर ते मध्य प्रदेशात जानार आहेत असे म्हणाले, सोबत आमचे समाजाचे आक्कलकोटचे धडाडीचे नेते सुनीलभाऊ बंडगर होते ते रासप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहेत. ते नक्कीच दोन दिवस चांगले लोक घेवून येणार आहेत व स्वागताध्यक्ष श्रीराम हणमंतराव पाटील बेलाटीकर त्यांचा सत्कार करतील. मा.आमदार रामहरी रूपनवर आप्पा अध्यक्ष यांनी श्री सुनीलभाऊ बंडगर आक्कलकोट यांच्या कार्याचा गौरव केला.

आमचे मित्र विनोद निकाळजे झारखंड आरपीआय संपर्क प्रमुख यांनी श्री रामभाऊ सरवदे महाराष्ट्र अध्यक्ष आरपीआय यांना भेटून पत्रीका देण्याचे कळवले होते त्या प्रमाणे मी त्यांना भेटून निमंत्रण दिले. दि. २५|२|२०२४ रोजी रामदास जी आठवले केंद्रीय समाज कल्याण मंत्री सोलापूरात येणार आहेत ते संमेलनाला भेट देण्याची शक्यता आहे.आमचे आठवले साहेबांशी जुनेच संबंध आहेत.आले तर संमेलनात स्वागतच आहे.तसेच डाॅ.श्रीमंत कोकाटे लेखक, वक्ते, विचारवंत, व संमेलनाच्या समारोपाचे उद्घाटक यांनाही निमंत्रण दिले ते येणारच आहेत.

त्या मुळे संमेलनाला येणार्या रसीकांना नक्कीच यांचे बहुमोल विचार ऐकावयास मिळतील. संमेलनात विविध विचारांचे रंग भरले जातील.
निमंत्रण देण्यासाठी व समन्वयक म्हणून श्री बिसलसिद्ध काळे पत्रकार, श्री उज्ज्वलकुमार माने संपादक, लेखक यांनी महत्वाची भूमीका बजावली.

डाॅ.अभिमन्यु टकले.

READ MORE
Blog

पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य जाहीर.

सोलापूर: पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य

शनिवार व रविवार दिनांक २४|२|२४ व २५|२|२४ रोजी श्री संत सदगुरू बाळूमामा मंदिर विजापूर हायवे बेलाटी ता.उत्तर सोलापूर जि सोलापूर येथे होणार आहे.या दोन दिवसात श्रोत्यांना बौद्धीक मेजवानी व विचाराची आदानप्रदान होणार आहे. अशी माहिती डाॅ.अभिमन्यु टकले यांनी पत्रकार परिषदेत मांडली.पाचव्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्यिक वक्ते माजी आमदार ऐडव्होकेट रामहरी रूपनवर माळशिरस यांची निवड झाली आहे.तर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष पदी श्री संत बाळूमामा ट्रस्ट विजापूर बायपास हायवे बेलाटी चे अध्यक्ष श्रीराम हणमंतराव पाटील यांची निवड झाली आहे.

शनिवार दिनांक २४|०२|२०२४ रोजी सकाळी ८ते११:३०या दरम्यान साहित्य दिंडी निघणार आहे. दिंडीच्या पालखीचे पुजन माजी आमदार दिलीपराव माने हे करतील. दिंडी श्रीराम हणमंतराव पाटील बेलाटीकर स्वागताध्यक्ष यांच्या बेलाटीतील वाड्यासमोर पुजन करून निघेल. श्री सदगुरू बाळू मामा मंदिर येथे बाळू मामाच्या नावान चांग भल म्हणून टेकवली जाईल.

दिंडीत गजे ढोल, लेझीम अशी पथके आहेत.

दुपारी १२ते ३या वेळेत श्री संत सदगुरू बाळूमामा मंदिर विजापूर हायवे बेलाटी येथे साहित्य संमेलना चा उद्घाटन सोहळा आहे.साहित्य स्थळाला संत बाळूमामा साहित्य नगरी असे नाव दिले आहे. विचार पिठाला श्री सिध्देश्वर विचार पीठ असे नाव देण्यात आले आहे.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या नावाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.उद्घाटन साठी मा.सुशीलकुमार शिंदे साहेब माजी ग्रंहमंत्री यांना निमंत्रण दिले आहे.

मा.चंद्रकांत दादा पाटील पालक मंत्री सोलापूर, आमदार श्री राम शिंदे माजी मंत्री, श्री विजय देशमुख आमदार उत्तर सोलापूर, श्री सुभाष देशमुख आमदार दक्षिण सोलापूर, प्रा. श्री अजय दासरी शिवसेना जिल्हाप्रमुख, पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संमेलनास राज्यासह देश भरातून अनेक साहित्यीक उपस्थित राहणार आहेत. डाॅ.श्रीपाल सबनीस अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मा.संजय सोनवनी अध्यक्ष पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य सोलापूर, श्री राजा माने अध्यक्ष सोशेल मिडीया अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, घनश्याम होळकर भरतपुर राजस्थान लेखक, श्री पंडीत चंद्रकांत बिज्जरगी गुरूजी प्रसिद्ध साहित्यिक विजापूर, डाॅ.मुरहरी केळे संत साहित्य अभ्यासक मुंबई, डाॅ.श्रीमंत कोकाटे,साहित्यीक व वक्ते पुणे,डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर, श्री सुभाष बोंद्रे दिव्य मराठी स्टेट हेड व साहित्यीक, प्रा.यशपाल भिंगे साहित्यीक नांदेड, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन समारंभा पुर्वी निधन झालेल्या साहित्यीकांना आदरांजली वाहिली जाणार आहे.स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे.भंडारा उधळून यळकोट यळकोट जय मल्हार च्या घोषणा देत साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले जाणार आहे.नंतर पुस्तक प्रकाशन केले जातील. सर्व मान्यवरांचे स्वागत केले जाणार आहेत. राज्यभरातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सेवकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.त्यानंतर मान्यवरांकडून श्रोत्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.अध्यक्षीय भाषणाने उद्घाटन समारंभ समारोप होईल. ३ते ४:३० या वेळेत एक परिसंवाद आयोजित केला आहे .सांयकाळी ४:३०ते६:३० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

सायंकाळी ६:३० ते रात्री ८:३० वाजता कवी संमेलनाचे उद्घाटन श्री राम माडुंरके कवी निव्रुत्त सहायक पोलीस आयुक्त पुणे हे करतील. संयोजन भारतकुमार मोरे करतील. श्री रविराज मेटकरी हे कवी संमेलनाध्यक्ष असतील. महाराष्ट्र राज्यातून ४० कवी सहभागी होणार आहेत.

दुसर्‍या दिवसी रविवार दिनांक २५|०४|२०२४ रोजी सकाळी ०९वाजता परिसंवादाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दिवसभरात चार विविध विषयांवर चार परिसंवाद होणार आहेत. सांयकाळी ४ते ६ या वेळेत समरोप कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचे उद्घाटक डाॅ.श्रीमंत कोकाटे इतिहास संशोधक पुणे हे आहेत. डाॅ.बाबासाहेब बंडगर माजी कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर हे समारोपाचे अध्यक्ष आहेत. प्राचार्य आर एस चोपडे सर, विष्णु माने नगरसेवक सांगली,श्री रामराव वडकुते माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष हिंगोली, मा.आमदार हरिदास जी भदे आकोला,प्रा.सुषमा अंधारे, श्री आण्णासाहेब डांगे साहित्यीक व माजी मंत्री, उपस्थित राहणार आहेत.

श्री ज्ञानेश्वर ढोमणे आमरावती, श्री पवन थोटे यवतमाळ., तसेच श्री अजय दासरी शिवसेना जिल्हाप्रमुख उपस्थित राहणार आहेत. ऐडव्होकेट चिमन डांगे इस्लामपूर हे उपस्थित राहणार आहेत. सौ रुक्मीणी ताई गंलाडे,एसीपी पुणे,श्री बाळासाहेब कोपनर डीवायएसपी पिंपरी चिंचवड हेही उपस्थित राहणार आहेत. श्री रामदास कोकरे सहआयुक्त नगर रचना जिल्हाधिकारी कार्यालय लातूर.

समारोपात राज्यातील अधिकारी व मान्यवर उपस्थित सर्व साहित्यीकांचा सत्कार करण्यात येणार आहेत. समारोप मान्यवरांची मार्गदर्शन पर भाषणे होतील. ग्रंथ दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या. कलाकारांना प्रशस्ती पत्रक दिले जाणार आहेत. विविध विषयांवर ठराव पास केले जाणार आहेत. संमेलनाध्यक्ष समारोपाचे भाषण करतील. श्री सिध्दारूड बेडगनूर सर संयोजक आभार प्रदर्शन करतील व राष्ट्र गिताने कार्यक्रमाची सांगता होईल.

पत्रकार परिषदेत ऐडव्होकेट रामहरी रूपनवर यांचा साहित्य संमेलन अध्यक्ष निवड झाली म्हणून सत्कार करण्यात आला. पत्रकार परिषदेस खालील मान्यवर उपस्थित होते. ऐडव्होकेट रामहरी रूपनवर नियोजित साहित्य संमेलन अध्यक्ष. श्रीराम हणमंतराव पाटील बेलाटीकर स्वागताध्यक्ष, श्री संभाजीराव सुळ उपाध्यक्ष, डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक, श्री सिध्दारूड बेडगनूर सर संयोजक, श्री देवेंद्र मदने सर मार्गदर्शक,श्री रामचंद्र खांडेकर दाजी मोहळ,श्री विलास पाटील धनगर समाज अध्यक्ष, श्री बिसलसिद्ध काळे प्रसिद्धी प्रमुख, श्री चंद्रकांत हजारे इ.मान्यवर उपस्थित होते.

READ MORE