Blog

मा.डॉ.राजु़भाऊ डांगे,एक सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व

आमचे सहकारी राज्यस्तरीय धनगर‌ समाज ऊप- वधुवर परीचय‌ मेळाव्यात,अमरावती चे सक्रिय पदाधिकारी तथा मंगलयोग‌ परीचय पुस्तिका प्रकाशन प्रमुख श्री.डॉ.एड.राजु़भाऊ डांगे खरोखरच हरहुन्नरी, सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्व असुन ते सतत‌ योग प्रशीक्षण,वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान तसेच‌ कुठल्याही सामाजीक कार्यकमात सतत व्यस्त असतात.ते स्वत: सांखीकी अधिकारी वर्ग-२ या पदावर कार्यरत असताना सुद्धा त्यांना शिक्षणाचा जबरदस्तं ध्यास‌ असल्यामुळें त्यांनी नोकरी करुन आतापर्यंत १४ पदव्या प्राप्त‌ केल्या असुन त्यामध्ये ४ डॉक्टरेट,७ स्नातकोत्तर, व ३ स्नातक पदव्यांचा समावेश आहे.त्यामध्ये पिएचडी,एलएलएम सारख्या पदव्यांचा समावेश आहे.याच बरोबर ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तत्वज्ञानात ग्रामगिताचार्य हि पदवी सुद्धा त्यांनी प्राप्त केली आहे.ते स्वत:आंतरराष्ट्रीय योग ट्रेनर तसेच जेसीआयचे रास्ट्रीय‌ प्रशिक्षक असल्यामुळे त्यांनी आतापर्यंत हजारो ट्रेनिंग,प्रक्षिक्षन कार्यक्रम घेऊन हजारो विद्यार्थी तसेच प्रक्षिक्षणार्थी यांना प्रशीक्षीत केले आहे. ते आता सुद्धा आठवड्यांतुन चार दिवस रोज सकाळी योग शिबीर घेत‌ असुन त्यामध्ये भारत तसेच भारता बाहेरील योग साधक सहभागी होऊन त्यांच्या शिबीराचा लाभ घेत‌ असतात‌.त्यांचे सदर सामाजिक योगदान,योग शिबीरे,विविध विषयावरील व्याख्याने,जेसीआय चे अध्यक्ष म्हणुन केलेले ऊल्लेखनिय‌ कार्यामुळेच त्यांना आतापर्यंत राज्यस्तरीय,राष्ट्रीय स्तरावरील तसेच ईतरही क्षेत्रातिल विवीध पुरस्कार मिळाले आहेत. ते आमच्या राज्यस्तरीय धनगर‌ समाज ऊप- वधुवर परिचय मेळाव्याचे सुद्धा प्रमुख आधारस्तंभ असुन सतत १५ वर्षापासुन मंगलयोग‌ परीचय पुस्तिकेच्या प्रकाशनाची जबाबदारी ते लिलया पार पाडतात.तसेच दरवर्षी अमरावती येथे होणा-या राज्यस्तरीय धनगर‌ समाज ऊप- वधुवर परीचय‌ मेळाव्याच्या कार्यकमाचे ते स्वत: सुत्रसंचालन सुद्धा करीत असून सदर कार्यक्रम भारदस्त व अतिशय सुत्रबद्ध होत असल्यामुळें महाराष्ट्रातुन सर्वच स्तरावरुन सदर कार्यक्रमाची स्तुति होत असते. असे आमचे राजाभाऊ डांगे सर्वच क्षेत्रात सर्वगुणसंपन्न असुन त्यांचे बाबत जेवढे लिहावे तेवढे कमीच पडते.त्यांना आपल्या राष्ट्रीय आदिवासी धनगर‌ साहीत्य‌ सम्मेलनामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर समाज भूषण राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर झाल्याबद्धल त्यांचे राज्यस्तरीय धनगर‌ समाज ऊपवधुवर परिचय मेळावा आयोजन समीती अमरावती तसेच धनगर एंप्लॉईज वेलफेयर असोशिएशन (देवा संघटना) अमरावती तर्फे खुप खूप अभिनंदन.🙏🙏. लेखक:-श्री.ज्ञानेश्वर ढोमणे, अध्यक्ष, देवा संघटना तथा संयोजक, राज्यस्तरीय धनगर‌ समाज ऊप- वधुवर परीचय‌ मेळावा,अमरावती

READ MORE
Blog

आदिवासी धनगर साहित्य संमेलनचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

सोलापूर: सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन 11 व 12 एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील ऐतिहासिक होळकर राजवाड्यात होत असून, या संमेलनाच्या अनुषंगाने समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, ही माहिती संमेलनाचे संस्थापक प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले यांनी दिली.

राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे पुढील प्रमाणे आहेत. श्री. संजीवन खांडेकर, भूम, जिल्हा धाराशिव यांना उत्कृष्ट सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शैक्षणिक रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.
प्राचार्य श्री. सिद्धारूढ बेडगणूर, सोलापूर यांचे शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आणि सामाजिक सेवा उत्कृष्ट आहे. कोणत्याही कामासाठी ते सदैव तत्पर असतात. ते एका शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष असून प्राचार्य आहेत. यांना श्री संत बाळूमामा समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

सौ. रूपाली लंभाते-अवचरे, कवयित्री पुणे. या कवियत्री असून दिवाळी अंक व अनेक नवोदित आणि प्रख्यात लेखक यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे काम करतात. त्यांचीही अखंड साहित्यिक सेवा, सामाजिक सेवा विचारात घेऊन त्यांना कवी कालिदास साहित्य भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

श्री. प्रवीण काकडे, कराड, जिल्हा सातारा. यांचे समाजासाठी व समाज प्रबोधनासाठी खूप मोठे कार्य आहे. दरवर्षी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून समाजातील युवकांना व युवतींना मार्गदर्शन करत असतात. यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

श्री. गणेश पुजारी, पुणे. या व्यक्तीने आयुष्यभर धनगर समाजाच्या सेवेसाठी वाहून घेतलेले आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता त्यांनी आजपर्यंत त्यांची सर्व हयात समाजाच्या सेवेसाठी घालवलेली आहे. अशा या महान कार्यासाठी त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

ॲड. बळवंतराव खोत, सांगली. यांचे सामाजिक कार्य अगदी उत्कृष्ट आहे. सांगलीमध्ये बाहेरून येणारे कोणीही समाजसेवक कार्यक्रम घेत असतील किंवा राज्यभर कोणत्याही प्रकारची चळवळ चालू असेल त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता धावून जाणारे ॲड. बळवंतराव खोत यांना सुभेदार मल्हारराव होळकर समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

श्री. पवन थोटे, यवतमाळ, समाजसेवेमध्ये जीवनभर कार्यरत असलेले श्री. पवन थोटे यांनी यवतमाळ जिल्ह्याची समाजसेवा जिवंत ठेवलेली आहे. तसेच राज्यभर ज्या विविध चळवळी होतात त्या चळवळीमध्ये यवतमाळकरांना सक्रिय सहभाग घ्यायला लावणारे पवन थोटे यांना राजा हल सातवाहन समाजसेवा पुरस्कारने सन्मानित करण्यात येत आहे.

डॉ. महादेव बनसुडे, लातूर, वैद्यकीय सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे प्रा. डॉ. महादेव बनसुडे यांना क्रांतिरत्न विठोजी होळकर वैद्यकीय सेवा पुरस्कार देण्यात येत आहे.

श्री. गोविंद गोरे, नांदेड. हे रुग्णालयामध्ये कर्मचारी असलेली व्यक्ती. यांना समाजाबद्दल खूप गर्व आणि अभिमान आहे. तसेच रुग्णालयीन सेवा असो, समाजसेवा असो किंवा राज्यस्तरीय कुठल्याही प्रकारच्या चळवळी असो, राज्यस्तरीय कोणत्या प्रकारचे कार्यक्रम असो ते त्यामध्ये सक्रिय भाग घेतात व सर्व प्रकारचे सहकार्य करतात. अशा या व्यक्तीला संत कनकदास समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करणार आहे. डॉ. आहिल्या वाघमोडे, कराड. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शैक्षणिक आणि संशोधनसाठीचा पुरस्कार आहे. प्रा. डॉ. महेश चौरे, आंबेजोगाई यांना अहिल्या रत्न साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

प्राचार्य धोंडीराम गडदे यांना महाराजा श्रीमंत शिवाजीराव होळकर शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे.

अशा तऱ्हेने राष्ट्र सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या संयोजक टीमने पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध मान्यवरांची निवड केलेली आहे निवड समिती उज्वल कुमार माने पत्रकार. माननीय बाळासाहेब धरणावर पाटील महाराष्ट्र अध्यक्ष.
बापूसाहेब शिंदे संयोजक श्री शिवाजीराव ढेपले स्वागताध्यक्ष. श्री सोमनाथ जी करणावर पाटील एपीआय व संचालक. एडवोकेट सौ जयश्री ताई तेरकर महिला आघाडी अध्यक्ष.
प्राचार्य आर एस चोपडे सर.

READ MORE
Blog

धनगर समाजात जन्मलेले संत तुकाराम डॉ अभिमन्यू टकले होय!

डॉ अभिमन्यू टकले. ध्येयाने झपाटलेला माणूस. अत्यंत शांत वृत्ती. धनगरांना शहाणं करून सोडायचं या ध्येयाने पछाडलेला माणूस आहे. मुळात साहित्य संमेलन भरवण अत्यंत अवघड काम आहे. त्यांत धनगराचं साहित्य संमेलन भरवण म्हणजे कच्च्या घड्यानें पाणी भरण्या सारखे काम आहे. ते पाणी भरणं डॉ टकले यांनी केलं.

भगवान शंकराला जे जमलं नाही ते डॉ अभिमन्यू टकले नावाच्या माणसाने करू दाखविले.

धनगराचा उद्धार करावा म्हणुन शंकराने खंडोबाचा अवतार घेतला होता. धनगर शहाणा होणं तर सोडाच उलट शहाणा असलेलेला महादेव म्हणजे खंडोबा धनगरांच्या नादी लागून वेडा झाला. लोक त्याला येडा मल्हारी म्हणु लागले. त्यांना सुधारायचे म्हणुन डॉ टकले घरा बाहेर पडले. त्यांच्या कामाच सूत्र होतं ते म्हणजे धनगरातील साहित्यिक शोधायचे त्यांना प्रसिद्ध करायचे आणि ईतर धनगरांना साहित्यिक बनवायचे.

साहित्य हे सुशिक्षित आणि सुसंकृत माणसाचं प्रतीक आहे. त्यांच्यातील साहित्यिक जागा केला म्हणजे तो माणूस सर्वं अंगाने श्रीमंत होतों. म्हणुन मग त्यांनी आदिवासी धनगर साहित्य संमेलन भरवायला सुरवात केली!
डॉ टकले यांनी धनगर साहित्य संमेलनाची कल्पना मांडली तेंव्हा सर्वं लोक त्यांना हसायचे. डॉ असं काही संमेलन भरवतील, त्यांना लोक भरवू देतील यावर कोणाचाच विश्वास नव्हता. माझा स्वतःचाही विश्वास बसत नव्हता. कारण चौडीत अहिल्यादेवीचा पुतळा बसवायला गेलो तो अनुभव घेऊन नुकतेच माझे हात भाजले होते. मी संपशेल माघार घेऊन घरात गप्प बसलो होतो.

तसंचं काही तरी डॉ टकलेंच होईल आणि त्यांना घरात बसाव लागेल असं मला वाटलं होतं. परंतु ठरलेल्या कामातून माघार घेणं हे डॉ टकलेना माहीत नव्हते. म्हणजे ते आरेला कारे करून समोरच्याला गप्प करतील असं काही त्यांच्या स्वभात नाही. ते शांत सय्यमी आहेत. त्यांच्यात परकोटीची सहन शिलता आहे. या सहन शिलतेने त्यांना विजय मिळवून दिला. पहिल्या संमेलनाला त्यांना खूप त्रास झाला. काही राजकीय नेते दांडगाई दाखवत होते. हे सर्वं त्यांनी संत तुकाराम सारखे सहन केले.
ज्यांचा सहित्याशी संबंध नाही ते राजकारणी म्हणत होते कीं आम्हाला अध्यक्ष करा. डॉ त्यांना समजून सांगितले हे साहित्यिकांचे संमेलन आहे. तुम्ही एखादे पुस्तकं लिहा मग तुम्हाला अध्यक्ष करू. पण पुढारी म्हणत होते, इथे पुस्तकाचा काही संबंध नाही. कार्यक्रम धनगर सजाजाचा आहे, धनगरांचा अध्यक्ष माझ्या शिवाय दुसरा कोणी नाही होऊ शकत.

पण डॉ साहेबांनी साहित्यिक आणि इतिहासकार संजय सोनवणी यांच्या अध्यक्षते खाली संमेलम घेतले व पार पाडले. यावेळी संभाजी सूळ त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिले. पुढे अनेक सज्जननी त्यांना पाठबळ दिले. ज्यात, बाळासाहेब करणवर, बेलाटीचे पाटील यांचा अर्थपूर्ण सहभाग आहे. तसेच बऱ्याच वेळी डॉ टकले यांनी पदर मोड करून 5 संमेलन पार पाडली. आता 6 व आदिवासी धनगर साहित्य संमेलनं 11 आणि 12 एप्रिल 2026 ला चांदवड या होळकरांच्या नगरीत होतं आहे.
याचे अध्यक्ष पद प्रा डॉ प्रकाश महानोर, सोलापूर विद्यापिठाचे कुलगुरु भूषविणार आहेत तर याचं उदघाटन तरुण तडफदार आमदार आणि फायर ब्रँड नेते गोपीचंद पडळकार यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी नाशिकच्या काळारामं मंदिराचे पुजारी महामंडलेश्वर महंत सुधीरदासजी महाराज उपस्थित राहणार आहेत.

हे वर्षे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्री संवत्सर जयंती वर्षे असल्यामुळे होळकर यांच्या महाराष्ट्रातील राजधानी चांदवड या शहरांत ठेवण्यात आले आहे. 11/12 एप्रिल असे दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला समाजातील अनेकं साहित्यिक आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थित समाजातील कर्तव्य तत्पर व्यक्तींचा सत्कार करण्यात येईल. तरी राज्यातील समाज बांधवानी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे हीं विनंती!

– बापू हटकर

READ MORE
Blog

सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन होळकर वाडा चांदवड जिल्हा नाशिक शनिवार रविवार दिनांक ११व १२ एप्रिल २०२६. कार्यक्रमाची रूपरेषा

सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार व रविवार दिनांक 11 व 12 एप्रिल 2026 रोजी होळकर वाडा चांदवड जिल्हा नाशिक येथे होणार आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश महानवर कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांची निवड झालेली आहे. अशी माहिती सस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले यांनी कळवले आहे.
या साहित्य संमेलनाचे कार्यवाहक प्राचार्य दत्तात्रय बारगळ हे आहेत तर संयोजक बापूसाहेब शिंदे हे आहेत. साहित्य संमेलन मार्गदर्शक व महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब कर्णवर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. तसेच एडवोकेट सौ. जयश्री तेरकर कवयित्री या महाराष्ट्राच्या महिला विभाग अध्यक्ष आहेत. साहित्य संमेलनाचे उद्घाटक युवा नेते आमदार गोपीचंद पडळकर हे आहेत.साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार आहे. साहित्य दिंडीचे उद्घाटन श्रीमंत अमरजीत बारगळ राजे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थितीमध्ये दिंडीच्या उद्घाटनास श्री वैभव बागुल नगराध्यक्ष चांदवड.श्री अभिमन्यू होळकर चांदवड हे असतील. यानंतर साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा होईल. उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते दीप पूजन करून व भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात होईल.

उद्घाटन समारंभाला खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मा. राम शिंदे सभापती विधान परिषद महाराष्ट्र शासन.
मा. सुधीर दास महाराज काळाराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत महामंडलेश्वर.
मा. डॉक्टर प्रकाश महानवर नियोजित संमेलन अध्यक्ष. माजी आमदार रामहरी रुपनवर संमेलन अध्यक्ष.आमदार गोपीचंद पडळकर साहित्य संमेलन उद्घाटक. श्री रामराव वडकुते खासदार राज्यसभा.
माजी आमदार हरिदास हरिदास जी भदे. मा. श्री सैतान सिंग पाल मंत्री मध्य प्रदेश. मा. उत्तम कांबळे माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.मा. सुभाष बोंद्रे कार्यकारी संपादक दैनिक दिव्य मराठी महाराष्ट्र राज्य.उद्घाटन सोहळ्यामध्ये ज्या साहित्यिकांना आपल्या पुस्तकांचे प्रकाशन करायचं आहे त्यांचं प्रकाशन केलं जाईल.आपल्या साहित्य संमेलनाचे व्यासपीठ सर्व जाती धर्मातील साहित्यिकांसाठी खुले राहील तसेच या उद्घाटन सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य केलेले जे मान्यवर आहेत त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार केला जाईल.
पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,काठी, घोंगडे असा असेल. तसेच चांदवडच्या विकासामध्ये जे चांदवडचे प्रश्न आहेत त्याचा पाठपुरावा करणारे चांदवडचे जे काही पत्रकार आहेत ते अगदी उत्कृष्ट कार्य करत आहेत. यामध्ये चांदवडच्या पत्रकारांचाही विशेष असा गौरव करण्यात येईल.

राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
श्री संजीवन खांडेकर सर भूम जिल्हा धाराशिव यांना उत्कृष्ट सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शैक्षणिक रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.
प्राचार्य श्री सिद्धारूढ बेडूगणर सर सोलापूर यांचे शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आणि सामाजिक सेवा अगदी उत्कृष्ट आहे. कोणत्याही कामासाठी ते सदैव तत्पर असतात. ते एका शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष असून प्राचार्य आहेत यांना श्री संत बाळूमामा समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

सौ.रूपालीताई लंभाते अवचरे कवयित्री पुणे. या कवियत्री असून दिवाळी अंक व अनेक नवोदित आणि प्रख्यात लेखक यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे काम करतात. त्यांचीही अखंड साहित्यिक सेवा सामाजिक सेवा विचारात घेऊन त्यांना कवी कालिदास साहित्य भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

श्री प्रवीण काकडे कराड, जिल्हा सातारा यांचे समाजासाठी व समाज प्रबोधनासाठी खूप मोठे कार्य आहे.दरवर्षी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून समाजातील युवकांना व युवतींना मार्गदर्शन करत असतात. प्रबोधन करत असतात. मानव सेवा करण्यासाठी प्रवृत्त करत असतात.यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

श्री गणेश पुजारी पुणे या व्यक्तीने आयुष्यभर धनगर समाजाच्या सेवेसाठी वाहून घेतलेले आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता त्यांनी आजपर्यंत त्यांची सर्व हयात समाजाच्या सेवेसाठी घालवलेली आहे. अशा या महान कार्यासाठी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

एडवोकेट बळवंतराव खोत सांगली यांचे सामाजिक कार्य अगदी उत्कृष्ट आहे. सांगलीमध्ये बाहेरून येणारे कोणीही समाजसेवक कार्यक्रम घेत असतील किंवा राज्यभर कोणत्याही प्रकारची चळवळ चालू असेल त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता धावून जाणारे एडवोकेट बळवंतराव खोत यांना सुभेदार मल्हारराव होळकर समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
श्री पवन थोटे यवतमाळ जिल्ह्यातील समाजसेवेमध्ये जीवनभर कार्यरत असलेले श्री पवन थोटे यांनी यवतमाळ जिल्ह्याची समाजसेवा जिवंत ठेवलेली आहे. तसेच राज्यभर ज्या विविध चळवळी होतात त्या चळवळीमध्ये यवतमाळकरांना सक्रिय सहभाग घ्यायला लावणारे श्री पवन थोटे यांना राजा हल सातवाहन समाजसेवा पुरस्कारने सन्मानित करण्यात येत आहे.

डॉ. महादेव बनसुडे लातूर, वैद्यकीय सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे प्राध्यापक डॉक्टर महादेव बनसुडे यांना क्रांतिरत्न विठोजी होळकर वैद्यकीय सेवा पुरस्कार देण्यात येत आहे.
श्री गोविंद गोरे नांदेड. गोविंद गोरे हे रुग्णालयामध्ये हे सर्व सामान्य कर्मचारी असलेली व्यक्ती यांना समाजाबद्दल खूप गर्व आणि अभिमान आहे तसेच रुग्णालयीन सेवा असो,समाजसेवा असो किंवा राज्यस्तरीय कुठल्याही प्रकारच्या चळवळी असो, राज्यस्तरीय कोणत्या प्रकारचे कार्यक्रम असो ते त्यामध्ये सक्रिय भाग घेतात व सर्व प्रकारचे सहकार्य करतात.अशा या व्यक्तीला आपण संत कनकदास समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करणार आहोत.रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस.

सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत परिसंवाद आणि चर्चासत्र होतील.
चर्चा सत्राचे विषय व वक्ते खालील प्रमाणे आहेत.
धनगर समाजाची शैक्षणिक स्थिती. अध्यक्ष प्राचार्य आर एस चोपडे सर सांगली.
वक्ते.प्राचार्य धोंडीराम गडदे पुणे..
धनगर जमातीच्या मेंढपाळ व्यवसायाची स्थिती काल आज आणि उद्या वक्ते चंद्रकांत हजारे आंबेजोगाई.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांची त्रि जन्मशताब्दी एक आढावा, वक्ते राम लांडे होळकर शाळेचे अभ्यासक जालना.
प्राचार्य डॉक्टर मधुकर सलगरे सर लातूर साहित्यिक व लेखक यांचेही व्याख्यान होईल.

श्री लक्ष्मण नजन सर यांचेही व्याख्यान होईल.
दुपारी तीन ते पाच साहित्य संमेलनाच्या समारोपाचा कार्यक्रम होईल.

समारोपाचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील आयपीएस हे असतील. कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे सर असतील. प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय बच्चुभाऊ कडू माजी आमदार व अध्यक्ष प्रहार जनशक्ती पार्टी हे असतील.मा. दिलीप भाऊ येडतकर मुख्य संपादक दैनिक विदर्भ मतदार अमरावती. मा. रेश्मा पुणेकर भारतीय बेसबॉल कप्तान. मा. श्री गणेश निंबाळकर. मा. श्री विनायक जी काळदाते कार्याध्यक्ष धनगर धर्म पेठ महाराष्ट्र राज्य.
समारोप सोहळ्यात सर्व स्थानिक संयोजक आयोजक व पाहुण्यांचा सत्कार करण्यात येईल.तसेच राहिलेल्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. सर्व वक्त्यांचे मार्गदर्शन होईल.
प्रमुख उपस्थितांची भाषणे होतील. धनगर जमातीवरील विविध प्रश्नावरती ठराव मांडले जातील. ठरावाचा कार्यक्रम झाल्यानंतर साहित्य संमेलना चे आभार प्रदर्शन होईल व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप होईल संयोजन समिती.

संस्थापक प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू टकले.
माननीय बाळासाहेब कर्णवर पाटील संचालक व मार्गदर्शक ्
श्री उज्वल कुमार माने पत्रकार साहित्यिक ़
श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपीआय ठाणे संचालक ़
माननीय एडवोकेट जयश्री तेरकर महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य
श्री संभाजी सुळ उपाध्यक्ष
प्राध्यापक देवेंद्र मदने सर. प्राचार्य दत्तात्रय बारगळ सर कार्यवाहक ़
श्री बापूसाहेब शिंदे संयोजक.
श्री शिवाजी ढेपले कार्याध्यक्ष ़ श्री समाधान बागल स्वागत अध्यक्ष

READ MORE
Blog

डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरू व मा.खासदार रामराव वडकुते यांचा सत्कार सोहळा.

सत्कार सोहळा मंगळवार दिनांक २४/०३/२०२६
वेळ : सायंकाळी ०६वाजता
स्थळ:नानासाहेब कर्णवर पाटील निवास.
गोरडवाडी. ता.माळशिरस जि.सोलापूर.

महाराष्ट्र राज्यातील सर्व क्षेत्रातील साहित्य प्रेमीना कळवण्यात येते की डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांची सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक च्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे. हे संमेलन शनिवार व रविवार दिनांक ११ व १२एप्रील २०२६ रोजी होत आहे. हे संमेलन होळकर शाहीच्या उपराजधानीत होत आहे व होळकरांच्या राजवाड्यात होत आहे. या ठिकाणी सुभेदार मल्हाराव होळकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वास्तव्य होते.तसेच हे साहित्य संमेलन पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दीनिमित्त होत आहे.

अशा या संमेलनाध्यक्ष पदी डॉ. प्रकाश महानवर कुलगुरु यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा संयोजन समिती मार्फत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे व संमेलन नियोजन बैठक ही ठेवण्यात आली आहे. तसेच मा.रामराव वडकुते साहेब यांची खासदार म्हणून निवड झालेली आहे त्या साठी त्यांचा सत्कार करणार आहोत.

उपस्थित सर्व मान्यवरांसाठी सहभोजन कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी या कार्यक्रमास हजर रहावे असे संयोजन समिती मार्फत :श्री बाळासाहेब कर्णवर पाटील उपाध्यक्ष श्री श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडी यांनी कळवले आहे .खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरु पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर.
श्री रामराव वडकुते नवनिर्वाचित खासदार. हिंगोली.
डाॅ. आर.डी. शेंडगे जनरल सर्जन उमरगा.
प्राचार्य आर एस चोपडे सर अध्यक्ष अहिल्या शिक्षण संस्था सांगली.
डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
मा.ब्रम्हानंद पडळकर मा.सभापती सांगली.
श्री हणमंतराव चौरे शिवसेना नेते सातारा.
श्री संभाजीराव सुळ मा.संचालक डीसीसी बॅक लातूर.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सचिव साहित्य संमेलन
श्री गोविंद काळे सोलापूर. श्री उज्ज्वलकुमार माने लेखक पत्रकार सोलापूर.
श्री देवेंद्र मदने सर सोलापूर. प्राचार्य श्री बेडगनूर सर सोलापूर
श्री बापूसाहेब शिंदे संयोजक नाशिक.
भजनदास चोरमले चेअरमन.
नईम खान पठाण
प्रा.शिवाजी बंडगर सर माजी सभापती करमाळा.
डाॅ.मारूती पाटील
श्री आप्पासाहेब देशमुख मा.नगराध्यक्ष माळशिरस.

READ MORE
Blog

आमदार गोपीचंद पडळकर सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक ला उद्घाटनास येणार.


प्राचार्य डाॅ अभिमन्यु टकले.

पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण म्हणजे प्रस्थापित आणि घराणे शाहीचे राज्य. सत्तेच्या मस्तीत माजलेली घराणी आणि माजलेले प्रस्थापित. या माजलेल्या लोकांचे एकच तंत्र दिन दलित ओबीसी यांच्यात पश्चिम महाराष्ट्रात कोणीही नेता होवू द्यायचा नाही. सत्तेचा वापर करून खोटे गुन्हे दाखल करून बदनाम करुन , वेंळ आलीच तर एमपीडी करून नेते संपवले जात होते. किंवा आपल्यातलेच एखादा भुकंनारा श्वान सोडून नेते संपवने. अशा भयंकर व भयावह परिस्थितीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाचा जन्म झाला. मा.बापूसाहेब हटकर बदलापूर ठाणे यांची खूप मोठी ईच्छा की राज्यातील सर्व कार्य करणार्या लोकांनी एकत्र काम केले पाहीजे लढणार्याच्या बरोबर खंबीर पणे उभा राहीले पाहिजे. श्री बाळासाहेब कर्णवर पाटील, श्री हणमंतराव चौरे तात्या ,संभाजीराव सुळ आणि महाराष्ट्र राज्यातील अनेक राजकीय आणि समाज सेवकांची प्रबळ ईच्छा होती की मा.आमदार गोपीचंद पडळकर यांनी या साहित्य संमेलन चळवळीच्या उद्घाटनास यावे. आमदार गोपीचंद पडळकर हे जन्मानी कर्मानी लोक नेते आहेत. महाराष्ट्र राज्यातील घराणेशाहीतील नेते हे बनवलेले आणि लोकांवर जबरदस्ती लादलेले असंवेदनशील चिखलाच्या पुतळया सारखे नेते आहेत. Gopichand Padalkar is born leader and not made leader like established leaders.

मी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सकाळी तक्रार निवारण लोकशाही दरबारात गेलो अनेक कार्य कर्ते आले होते. सगळ्यांचे आदरा तिथ्य करणारी टिम होती आमचे ही आदरातिथ्य केले.आम्ही बाळासाहेब कर्णवर पाटील ,उज्ज्वलकुमार माने मी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले . स्वतः आमदार गोपीचंद पडळकर यांनी माझा फेटा बांधून व शाल पांघरुण सत्कार केला. साहित्य संमेलन उद्घाटनास येण्याचे निमंत्रण स्वीकारले. त्यांचा लोकशाही दरबार पाहून असे वाटते की भाजप सरकारने धनगर समाजाला भाजप तर्फे कैबिनेट मंत्री पद दिलेले नाही. जर आमदार गोपीचंद पडळकर सारख्या आमदाराना कैबिनेट दर्जा मिळाला तर धनगर समाजाचेच नाहीतर सर्व जाती जमातीचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल व सरकारचे लोक पाठबळ मजबूत होवू शकते.
आमदार गोपीचंद पडळकर यांचे मी आभार मानले. भेटी मुळे आनंद झाला.आमदार गोपीचंद पडळकर यांना खूप मोठा राजकीय पल्ला गाठण्या साठी शुभेच्छा.



प्राचार्य डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य व अध्यक्ष धनगर धर्म पीठ महाराष्ट्र.

READ MORE
Blog

मा.प्रा. डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरु यांचे आभार .

मा.प्रा.डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरू पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांची सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन होळकर वाडा (रंग महाल) महाराष्ट्र राज्य च्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे .याची प्रचंड अशी दखल प्रिंट मिडीयाने घेतलेली आहे.

मिडीया हा लोकशाहीचा आरसा आहे.

दैनिक, व्रुत्त,साप्ताहिक ,मासिक, नैमित्तिक अंक हे समाजाचा आरसा आहे. सोसेल मिडीया आला असला तरी प्रिंट मिडीयाचे महत्त्व कमी झालेले नाही. सोसेल मिडीया हा उशीरा आला आणि स्टंट बाजीमुळे जन माणसातील विश्वास गमावत आहे.प्रिंट मिडीयाचे आभार.तसेच प्रा. डाॅ .प्रकाश महानवर कुलगुरु यांनी धनगर साहित्य संमेलन होळकर वाडा चांदवड जि.नाशिक अध्यक्ष पद स्विकारल्या बद्दल आभार.

प्राचार्य डॉ.अभिमन्यू टकले संस्थापक आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.

धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.

READ MORE
Blog

सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि. नाशिक अध्यक्ष पदी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांची निवड

राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार आणि रविवार दिनांक ११ व १२ एप्रिल २०२६ ला होळकर वाडा चांदवड जि. नाशिक येथे होत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश अण्णा महानवर यांची सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक पदी निवड करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ. अभिमन्यु टकले संस्थापक राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य यांनी निवड जाहीर केली आहे.

तसेच हे साहित्य संमेलन होळकराची उपराजधानी होळकर वाडा चांदवड जि.नाशिक येथे होत आहे. संयोजक श्री बापूसाहेब शिंदे आहेत. कार्याध्यक्ष शिवाजी ढेपले आहेत. स्वागताध्यक्ष समाधान बागल आहेत.
प्राचार्य दत्तात्रय बारगळ सर कार्यवाहक आहेत.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दीनिमित्त होळकर वाडा चांदवड जि. नाशिक येथे दिनांक शनिवार व रविवार ११ व १२ एप्रील २०२६ रोजी हे आदिवासी धनगर साहित्य संमेलन होत आहे.

डॉ. प्रकाश महानवर हे मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालक पदावर कार्यरत होते. ०१ जून १९६७ रोजी जन्मलेल्या प्रा. महानवर हे पॉलिमर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. डॉ. प्रकाश महानवर हे शिक्षण क्षेत्रात २८ वर्षांपासून कार्यरत असून मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील पॉलिमर आणि सरफेस इंजिनिअरिंग या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तिथे ते मानव संसाधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता म्हणूनही कार्यरत होते. डॉ.प्रकाश महानवर यांनी केमिकल व प्लास्टिक टेक्नॉलॉजीमधून बीएससी आणि एमएस्सी केले असून पॉलिमर क्षेत्रात पीएचडी केली आहे. त्यांच्या नावे पॉलिमर क्षेत्रात संशोधनपर ५ राष्ट्रीय आणि आतरराष्ट्रीय पेटंट्स असून २ पेटंट्ससाठी अर्ज केलेला आहे. १२ संशोधनपर शोधनिबंध, राष्ट्रीय उद्योगासाठी सल्लागार म्हणून कार्य. आजपर्यंत त्यांनी ११२ संशोधनपर शोधनिबंध लिहिले असून यातील अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी आजपर्यंत ३२ संशोधनपर प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २१ विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली असून ९ विद्यार्थी पीएचडी करत आहेत. अनेक राष्ट्रीय उद्योगासाठी त्यांनी सल्लागार म्हणूनही कार्य केले आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेतला आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्य आहेत. महाराष्ट्र अकॅडेमी ऑफ सायन्स आणि द कलर सोसायटीचे ते फेलो आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर चे कुलगुरू म्हणून कार्य करताना त्यांनी विद्यापीठ विकास व शैक्षणिक क्षेत्राचा विकास करत विद्यापीठाचे नावलौकीक देशात आणि प्रदेशात ही केले आहे. मूळचे देवडी (ता. माण, जि. सातारा) येथील डॉ. प्रकाश महानवर यांची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच. त्यांच्याकडे अर्धा एकर शेती अन्‌ काही मेंढरे होती. आई-वडील दोघेही अशिक्षित असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही हे विशेष. माळरानावर मेंढरे राखतच त्यांनी माध्यमिकपर्यंत शिक्षण पूर्ण केले. गावातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. प्रकाश यांनी मानगड येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दहिवडी येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ते मुंबईत आले. मुंबई विद्यापीठात विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतले आणि त्याच विद्यापीठात नोकरीला लागले. विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करताना त्यांनी आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. त्यांच्या या असामान्य कर्तव्याची दखल घेत त्यांची अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यापीठात आज त्यांना अध्यक्ष पदाचे निवड पत्र देण्यात येत आहे. तरी महाराष्‍ट्र राज्‍यातील सर्व सामाजिक, शैक्षणिक साहित्‍यीक, सांस्‍कृतीक क्षेत्रातील मान्‍यवरांनी दिनांक ११ व १२ एप्रील २०२६ रोजी या बौध्‍दीक कार्यक्रमाचा लाभ घ्‍यावा. हे व्‍यासपीठ सर्व जाती धर्मासाठी मोफत व खुले असणार आहे.

खालील मान्यवरानी कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
प्राचार्य
डॉ.अभिमन्यु टकले संस्थापक सोलापूर,
मा.आमदार रामहरी रूपनवर अध्यक्ष.
अर्जुनदादा सलगर
सोलापूर मा.आमदार हरिदास भदे आकोला.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील माळशिरस,
क्रुष्णा बुरुंगले.
श्री हणमंतराव चौरे शिवसेना सातारा.
श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपीआय मुंबई.
प्राचार्य आर. एस. चोपडे सर सांगली,
श्री बापूसाहेब हटकर.मुंबई अध्यक्ष धनगर धर्म पीठ.
श्री संभाजीराव सुळ उपाध्यक्ष लातूर,
डाॅ. आर डी शेंडगे सर जनरल सर्जन उमरगा.
डाॅ. हणमंतराव किणीकर न्युराॅलाॅजीस्ट लातूर.
मा.सुभाष बोंद्रे लेखक व वक्ते दैनिक दिव्य मराठी कार्यकारी संपादक महाराष्ट्र. संभाजीनगर
प्रा.यशपाल भिंगे नेते,वक्ते,लेखक नांदेड.
प्रा.संजय शिंगाडे सांगोला, प्रा.देवेंद्र मदने सर, प्रा.सिद्धारूढ बेडगनूर सर, गोविंद काळे वरिष्ठ साहित्यिक, उज्ज्वलकुमार माने लेखक व पत्रकार सोलापूर, समाधान बागल चांदवड स्वागताध्यक्ष . बिसलसिद्ध काळे
शिवाजी ढेपले कार्याध्यक्ष निफाड,
श्री बापूसाहेब शिंदे नाशिक. संयोजक.
श्री मच्छिंद्र बिडगर चांदवड.
श्री मुकुंद होळकर चांदवड.
श्री विनायक काळदाते.नाशीक
प्राचार्य दत्तात्रय बारगळ चांदवड. कार्यवाहक.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर.सचिव.
श्री पांडुरंग रुपनवर उद्योजक सांगली राज्य उपाध्यक्ष.
श्री संजीवन खांडेकर सर ता.भूम मराठवाडा प्रमुख.
श्री बळवंतराव खोत सांगली.
श्री विष्णु माने नगरसेवक सांगली.
डाॅ स्नेहा सोनकाटे धाराशिव.
डाॅ . रक्षा महाजन लेखीका नागपूर.
श्री शरद चोरमले राज्य समन्वयक ईट.
श्री आमरजीत बारगळ राजे नंदूरबार.
प्राचार्य दत्तात्रय बारगळ चांदवड.
श्री भाऊसाहेब ओव्हाळ नाशिक.
श्री राघवेंद्र गावडे उमरगा.
प्रा.शिवाजी बंडगर सभापती करमाळा.
डाॅ मधुकर सलगरे लेखक लातूर. झ
एडव्होकेट अभिमान हाके पाटील मुंबई.
श्री नागू विरकर मुंबई.
श्री गणेश पुजारी पुणे.
श्री अंकुश भांड पुणे.
प्रा.नजन सर पुणे.
मा.सुभाष पाटील खेमनार शिर्डी.
श्री खंडु महानवर मुंबई.
श्री भारत कवीतके साहित्यिक मुंबई.
प्राचार्य कुंडलिक आलदर सर सांगोला.
श्री बाळासाहेब टकले करमाळा.
श्री अंगद देवकते करमाळा.
श्री बालाजी पेठेकर कवी नांदेड.
श्री शिवाजी कोनापूरे पत्रकार नांदेड.
डाॅ.अनिल दुधभाते नेत्र तज्ञ पुणे.
डाॅ. नितीन वाघमोडे IRS मुंबई.
प्रा.डाॅ महेश चौरे आंबेजोगाई
श्री व्यंकटेश चामनर सर आंबेजोगाई.
श्री रामदास कोकरे उपायुक्त नवी मुंबई.
श्री पवन थोटे यवतमाळ.
श्री प्रभाकर दिवनाले महाराज लेखक आकोला.
श्री लक्ष्मण सरोदे पत्रकार आकोला.
श्री मल्हारी नवले चोराखळी.श्री प्रवीण काकडे कराड
श्री राजू लोणारी नगराध्यक्ष ता.येवला जी.नाशिक.
डाॅ.अरुण गावडे ठाणे ईजिंनियर धुळाशेठ शेंडगे बेंगलोर.
श्री चंद्रकांत हजारे प्रवक्ते, पत्रकार, समाज सेवक आंबेजोगाई
श्री सुनिल नवले पुणे
श्री विक्रम भैय्या ढोणे जत बिरु शेजाळ सांगली.

READ MORE
Blog

सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि. नाशिक अध्यक्ष पदी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांची निवड

राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार आणि रविवार दिनांक ११ व १२ एप्रिल २०२६ ला होळकर वाडा चांदवड जि. नाशिक येथे होत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश अण्णा महानवर यांची सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक पदी निवड करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ. अभिमन्यु टकले संस्थापक राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य यांनी निवड जाहीर केली आहे.

तसेच हे साहित्य संमेलन होळकराची उपराजधानी होळकर वाडा चांदवड जि.नाशिक येथे होत आहे. संयोजक श्री बापूसाहेब शिंदे आहेत. कार्याध्यक्ष शिवाजी ढेपले आहेत. स्वागताध्यक्ष समाधान बागल आहेत.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दीनिमित्त होळकर वाडा चांदवड जि. नाशिक येथे दिनांक शनिवार व रविवार ११ व १२ एप्रील २०२६ रोजी हे आदिवासी धनगर साहित्य संमेलन होत आहे.

डॉ. प्रकाश महानवर हे मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालक पदावर कार्यरत होते. ०१ जून १९६७ रोजी जन्मलेल्या प्रा. महानवर हे पॉलिमर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. डॉ. प्रकाश महानवर हे शिक्षण क्षेत्रात २८ वर्षांपासून कार्यरत असून मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील पॉलिमर आणि सरफेस इंजिनिअरिंग या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तिथे ते मानव संसाधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता म्हणूनही कार्यरत होते. डॉ.प्रकाश महानवर यांनी केमिकल व प्लास्टिक टेक्नॉलॉजीमधून बीएससी आणि एमएस्सी केले असून पॉलिमर क्षेत्रात पीएचडी केली आहे. त्यांच्या नावे पॉलिमर क्षेत्रात संशोधनपर ५ राष्ट्रीय आणि आतरराष्ट्रीय पेटंट्स असून २ पेटंट्ससाठी अर्ज केलेला आहे. १२ संशोधनपर शोधनिबंध, राष्ट्रीय उद्योगासाठी सल्लागार म्हणून कार्य. आजपर्यंत त्यांनी ११२ संशोधनपर शोधनिबंध लिहिले असून यातील अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी आजपर्यंत ३२ संशोधनपर प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २१ विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली असून ९ विद्यार्थी पीएचडी करत आहेत. अनेक राष्ट्रीय उद्योगासाठी त्यांनी सल्लागार म्हणूनही कार्य केले आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेतला आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्य आहेत. महाराष्ट्र अकॅडेमी ऑफ सायन्स आणि द कलर सोसायटीचे ते फेलो आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर चे कुलगुरू म्हणून कार्य करताना त्यांनी विद्यापीठ विकास व शैक्षणिक क्षेत्राचा विकास करत विद्यापीठाचे नावलौकीक देशात आणि प्रदेशात ही केले आहे. मूळचे देवडी (ता. माण, जि. सातारा) येथील डॉ. प्रकाश महानवर यांची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच. त्यांच्याकडे अर्धा एकर शेती अन्‌ काही मेंढरे होती. आई-वडील दोघेही अशिक्षित असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही हे विशेष. माळरानावर मेंढरे राखतच त्यांनी माध्यमिकपर्यंत शिक्षण पूर्ण केले. गावातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. प्रकाश यांनी मानगड येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दहिवडी येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ते मुंबईत आले. मुंबई विद्यापीठात विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतले आणि त्याच विद्यापीठात नोकरीला लागले. विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करताना त्यांनी आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. त्यांच्या या असामान्य कर्तव्याची दखल घेत त्यांची अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यापीठात आज त्यांना अध्यक्ष पदाचे निवड पत्र देण्यात येत आहे. तरी महाराष्‍ट्र राज्‍यातील सर्व सामाजिक, शैक्षणिक साहित्‍यीक, सांस्‍कृतीक क्षेत्रातील मान्‍यवरांनी दिनांक ११ व १२ एप्रील २०२६ रोजी या बौध्‍दीक कार्यक्रमाचा लाभ घ्‍यावा. हे व्‍यासपीठ सर्व जाती धर्मासाठी मोफत व खुले असणार आहे.

खालील मान्यवरानी कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.प्राचार्य
डॉ.अभिमन्यु टकले संस्थापक सोलापूर,
मा.आमदार रामहरी रूपनवर अध्यक्ष.
मा.आमदार हरिदास भदे आकोला.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील माळशिरस,
श्री हणमंतराव चौरे शिवसेना सातारा.
श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपीआय मुंबई.
प्राचार्य आर. एस. चोपडे सर सांगली,
श्री बापूसाहेब हटकर.मुंबई अध्यक्ष धनगर धर्म पीठ.
श्री संभाजीराव सुळ उपाध्यक्ष लातूर,
डाॅ. आर डी शेंडगे सर जनरल सर्जन उमरगा.
डाॅ. हणमंतराव किणीकर न्युराॅलाॅजीस्ट लातूर.
मा.सुभाष बोंद्रे लेखक व वक्ते दैनिक दिव्य मराठी कार्याध्यक्ष महाराष्ट्र. संभाजीनगर
प्रा.यशपाल भिंगे नेते,वक्ते,लेखक नांदेड.
प्रा.संजय शिंगाडे सांगोला, प्रा.देवेंद्र मदने सर, प्रा.सिद्धारूढ बेडगनूर सर, गोविंद काळे वरिष्ठ साहित्यिक, उज्ज्वलकुमार माने लेखक व पत्रकार सोलापूर, समाधान बागल चांदवड स्वागताध्यक्ष . बिसलसिद्ध काळे
शिवाजी ढेपले कार्याध्यक्ष निफाड, श्री बापूसाहेब शिंदे नाशिक. संयोजक. श्री मच्छिंद्र बिडगर चांदवड. श्री मुकुंद होळकर चांदवड. श्री विनायक काळदाते.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर.सचिव.
श्री पांडुरंग रुपनवर उद्योजक सांगली राज्य उपाध्यक्ष.
श्री संजीवन खांडेकर सर ता.भूम मराठवाडा प्रमुख.
श्री बळवंतराव खोत सांगली.
श्री विष्णु माने नगरसेवक सांगली.
डाॅ स्नेहा सोनकाटे धाराशिव.
डाॅ . रक्षा महाजन लेखीका नागपूर.
श्री शरद चोरमले राज्य समन्वयक ईट.
श्री आमरजीत बारगळ राजे नंदूरबार.
प्राचार्य दत्तात्रय बारगळ चांदवड.
श्री भाऊसाहेब ओव्हाळ नाशिक.
श्री राघवेंद्र गावडे उमरगा.
प्रा.शिवाजी बंडगर सभापती करमाळा.
डाॅ मधुकर सलगरे लेखक लातूर. झ
एडव्होकेट अभिमान हाके पाटील मुंबई.
श्री नागू विरकर मुंबई.
श्री गणेश पुजारी पुणे.
श्री अंकुश भांड पुणे.
प्रा.नजन सर पुणे.
मा.सुभाष पाटील खेमनार शिर्डी.
श्री खंडु महानवर मुंबई.
श्री भारत कवीतके साहित्यिक मुंबई.
प्राचार्य कुंडलिक आलदर सर सांगोला.
बाळासाहेब टकले करमाळा.
श्री अंगद देवकते करमाळा.
श्री बालाजी पेठेकर कवी नांदेड.
श्री शिवाजी कोनापूरे पत्रकार नांदेड.डाॅ.अनिल दुधभाते नेत्र तज्ञ पुणे.
डाॅ. नितीन वाघमोडे IRS मुंबई.
प्रा.डाॅ महेश चौरे आंबेजोगाई
श्री व्यंकटेश चामनर सर आंबेजोगाई.
श्री रामदास कोकरे उपायुक्त नवी मुंबई.
श्री पवन थोटे यवतमाळ.
श्री प्रभाकर दिवनाले महाराज लेखक आकोला.
श्री लक्ष्मण सरोदे पत्रकार आकोला.
श्री मल्हारी नवले चोराखळी.

READ MORE
Blog

रविवार धनगर साहित्य संमेलनाची चांदवड जि.नाशिक येथे राज्य स्तरीय बैठक

सर्व क्षेत्रातील साहित्यीक लोकांना कळवण्यात येते की राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य ची बैठक होळकर वाडा चांदवड जि.नाशिक महाराष्ट्र येथे रविवार दिनांक ८|३|२०२६ रोजी सकाळी बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठक साहित्य संमेलन अध्यक्ष पदावर शिक्का मोर्तब करण्या साठी व साहित्य सम्मलेन तारीख ठरवण्या साठी व संमेलनाची पूर्व तयारी करण्या साठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. साहित्य संमेलन व्यासपीठ सर्व क्षेत्रातील साहित्यीका साठी व सर्व जाती धर्मातील साहित्यीक साठी खुले आहे. सर्वानी सहभागी व्हावे संयोजन समिती मा. आमदार रामहरी रूपनवर अध्यक्ष. माळशिरस.

श्री समाधान बागल चांदवड
श्री गणेश निंबाळकर चांदवड
श्री मुकुंदराजे होळकर. चांदवड, जि.नाशिक
श्री विनायक काळदाते चांदवड
श्री मच्छिंद्र बिडगर चांदवड.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे अमरावती.
प्रा. डॉ. अभिमन्यू टकले- संस्थापक अध्यक्ष सोलापूर
प्राचार्य आरएस. चोपडे सर सांगली
श्री संभाजीराव सूळ लातूर
श्री बाळासाहेब पाटील कर्णवर माळशिरस
श्री गोविंद काळे- सोलापूर.
प्रा. देवेंद्र मदने सोलापूर लेखक व वक्ते
प्रा. सिद्धारूढ बेडगनूर माजी मुख्याध्यापक सोलापूर.
श्री उज्वलकुमार माने – लेखक व पत्रकार सोलापूर.
श्री पांडुरंग रुपनवर सांगली कार्याध्यक्ष.
श्री बिसलसिद्ध काळे प्रसिद्धीप्रमुख राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य

READ MORE