Blog

डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरू व डाॅ श्रीपाल सबनीस सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक येथे येणार

सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन हे होळकर वाडा ता. चांदवड जि.नाशिक येथे होणार आहे. या संदर्भात डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांची भेट घेण्यात आली .साहित्य संमेलन अध्यक्ष पद व सहभागी साहित्यिक या विषयावर त्यांनी चर्चा केली. साहित्य संमेलनात सक्रिय सहभागी होणार असल्याचे सांगीतले. तसेच डाॅ श्रीपाल सबनीस अध्यक्ष ८९वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन यांचीही भेट घेतली.

ते पुस्तक प्रकाशन कार्यक्रमा निमीत्त सोलापूर ला आले होते. भेटी दरम्यान विविध विषयांवर चर्चा केली त्यांनीही चांदवड जि.नाशिक येथे साहित्य संमेलनाला सक्रिय रित्या येणार असल्याचे सांगीतले. डाॅ.श्रीपाल सबनीस सरांना थोडक्यात साहित्य संमेलनाची रुपरेषा सांगीतली. आपले चांदवड चे सहावे संमेलन दोन दिवसाचे असेल. सकाळी दोन तास साहित्य दिंडी होईल.नंतर तीन ते चार तास साहित्य संमेलन उद्घाटन सोहळा होईल. उद्घाटन सोहळ्यात पुस्तक प्रकाशन, राज्यातील पाच लोकांचा पुरस्कार व कौतुक सोहळा होईल व मान्यवरांची मार्गदर्शन व व्याख्याने होतील.

नंतर विविध विषयांवर दोन परिसंवाद होतील. सांयकाळी कविसंमेलन होईल. दुसर्या दिवसी परिसंवाद उद्घाटन होतील. वक्त्यांची व्याख्याने होतील.सांयकांळी तीन ते पाच या वेळेत साहित्य संमेलन समारोप सोहळा होईल. समारोपात मान्यवर सत्कार व मार्गदर्शन होईल. समाजाच्या विविध प्रश्नांवर ठराव मांडले जातील . आभार प्रदर्शन करून संमेलन समारोप होईल. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक सहभागीचा सत्कार केला जाईल . सर्व साहित्यीकांना प्रमाण पत्र दिले जाईल. साहित्य संमेलनातून जमातीच्या अनेक चळवळीचे प्रश्न मांडले आणि प्रश्न मार्गी लावले आहेत.
या वेळेस खालील मान्यवर उपस्थित होते.

श्री बाळासाहेब कर्णवर पाटील माळशिरस.
श्री उज्ज्वलकुमार माने पत्रकार, लेखक ,संपादक.
प्राचार्य डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
बिसलसिद्ध काळे पत्रकार.

प्रसिद्धी प्रमुख आदिवासी धनगर साहित्य संमेलन होळकर वाडा चांदवड जि.नाशिक. तसेच राज्यातील शैक्षणिक, साहित्यीक, सांस्कृतिक, सर्व क्षेत्रातील कलाकारांनी ,कवी , वक्ते यांनी आपली नावे खालील मान्यवरांकडे कळवावीत.या क्रांतिकारक व लोक चळवळीत सहभागी व्हावे. आपली चळवळीचे अनुकरण राज्यात झाले पाहिजे . आपली साहित्य संमेलने अनेक ठिकाणी प्रतीक्षेत आहेत. करमाळा, आमरावती, यवतमाळ , उस्मानाबाद , औरंगाबाद ,ठाणे,सांगली, महाबळेश्वर, बेॅगलोर. ईदौंर येथे संमेलन घ्यावे अशी अनेकांची जनतेतून मागणी आहे.अशा जनसामान्यांना आपल्या वाटणार्या चळवळीत सामील व्हा.लिहीते व्हा.बोलते व्हा.गाते रहा.अनेक नावे आली आहेत. आपणही खालील मान्यवरांकडे नावे कळवा.

श्री गोविंद काळे वरिष्ठ कवी,लेखक सोलापूर. 8459874278.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर, आमरावती.
राज्य सचिव. धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य फोन 9423434223
श्री बापूसाहेब हटकर.मुंबई. कवी,लेखक, नाटककार, अध्यक्ष धर्म पीठ. फोन:7710020069
श्री बिसलसिद्ध काळे लेखक व पत्रकार सोलापूर. प्रसिद्धी प्रमुख आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य. फोन:9921018221
श्री उज्ज्वलकुमार माने लेखक पत्रकार 9922424619
श्री समाधान बागल स्वागत अध्यक्ष 9373531094
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील 7798987001

जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवण्यात यावे.

READ MORE
Blog

आपल्या हक्काच्या व्यासपीठात सहभागी होण्यासाठी सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आपली नावे कळवावेत

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिजन्म शताब्दीनिमित्त आपले सहावे राष्ट्रीय धनगर साहित्य संमेलन रंगमहाल ता.चांदवड जि.नाशिक महाराष्ट्र राज्य येथे घेण्यात येणार आहे. मान्यवराच्या तारखा मिळाल्या की चांदवडचे संयोजन टिम बरोबर बैठक आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे पुर्ण नियोजन झाले की कार्यक्रम पत्रिका तयार केली जाणार आहे व मगच संमेलनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

साहित्य संमेलनाच्या पहिल्याच बैठकीत होळकर वाडा, रंगमहाल महाराष्ट्र राज्याच्या ऐतिहासिक, राजकीय पटलावर आला. चांदवडच्या मुद्रण प्रसार माध्यमांनी खूपच उचलून धरले.चांदवड होळकर शाहीची उपराजधानी असल्यामुळे व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिजन्म शताब्दीनिमित्त धनगर साहित्य संमेलन होणार असल्याने संमेलनाला आणखीनच वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

या संमेलनाची उत्सूकता खूपच वाढलेली आहे.अनेक लोकांचे फोन येत आहेत.आपले हे व्यासपीठ सर्व क्षेत्रातील ,सर्व जाती धर्मातील बौद्धीका साठी खुले आहे. साहित्य संमेलनाला उशीर होण्याचे कारण नगरपरिषद, महानगरपालिका, पंचायत व जि.प. निवडणूका होत्या. साहित्य संमेलन हे जमाती साठी क्रांतीकारी आणि ऐतिहासिक निर्णय आहे. साहित्य संमेलन घेण्या साठी अनेक मान्यवर तयार आहेत. अनेक तरुण पुढे येत आहेत. त्यातीलच एक तरुण श्री समाधान बागल हे तरूण आहेत. तसेच नाशिक मधील अनेक लोक संपर्कात आहेत. तसेच संमेलन यशस्वी करण्यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे राज्यातील सर्व पत्रकार, सर्व क्षेत्रातील साहित्यीक आहेत.

लोकशाही असो की राजे शाही असो साहित्य आणि वक्तृत्व हे शस्त्र आहेत ते राज्याचे, देशाचे तक्त बदलतात ,समाज परिवर्तन करतात. अशा या चळवळीत सहभागी होण्या साठी सर्व क्षेत्रातील साहित्यीकांनी आपली नावे कळवावेत. सर्व क्षेत्रातील अनेक दिग्गज आपल्या संमेलनात सहभागी पूर्वी झाले आहेत आणि आता ही होणार आहेत. चुकून कोणी राहू नये. लवकरच साहित्य संमेलन अध्यक्ष आणि साहित्य संमेलन तारीख जाहीर करण्यात येणार आहे.
आपल्या जमातीचा आवाज राज्याच्या आणि देशाच्या काना कोपऱ्यातून घुमन्या साठी एकमेव व्यासपीठ राष्ट्रीय धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य चांदवड जि.नाशिक.तरी राज्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या आपल्या हक्काच्या व्यासपीठात सामील व्हावे.
खालील मान्यवराकडे फोन करुन नावे कळवावीत.

श्री गोविंद काळे
वरिष्ठ कवी,लेखक सोलापूर. 8459874278.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर आमरावती.
राज्य सचिव. धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य
फोन 9423434223.
श्री बापूसाहेब हटकर.मुंबई. कवी,लेखक, नाटककार, अध्यक्ष धर्म पीठ.
फोन:7710020069,
श्री बिसलसिद्ध काळे लेखक व पत्रकार सोलापूर. प्रसिद्धी प्रमुख आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
फोन:9921018221′
श्री उज्ज्वलकुमार माने लेखक पत्रकार 9922424619
श्री समाधान बागल स्वागत अध्यक्ष
9373531094
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील
7798987001

जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवण्यात यावे.

READ MORE
Blog

सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक साठी अध्यक्ष निवडी बाबत.

सर्व क्षेत्रातील मान्यवराना कळवण्यात येत आहे की सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची उपराजधानी होळकर वाडा,रंगमहाल चांदवड जि.नाशिक या ठिकाणी घेण्यात येणार आहे.

आपण साहित्य संमेलन स्थळ जाहीर केले आणि सर्व महाराष्ट्र राज्याचे लक्ष या सुंदर अशा रंगमहालाकडे लागले. या बद्दल दैनिक प्रिंट मिडीयात राजस्तरीय लेख लिहिले गेले आणि राज्यातील आणि देशातील अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी भेटी दिल्या. हा रंगमहाल पर्यटन स्थळ म्हणून उदयाला येत आहे.संमेलन जाहीर केल्या नंतर अनेक निवडूनूका आल्या त्यामुळे संमेलनाला घेण्या साठी उसीर झाला आहे. देशभरातून आणि राज्यातून ही अनेक मान्यवरांना या साहित्य संमेलनाची उत्सुकता आहे.
तसेच देशभरातून हे संमेलन घेण्यासाठी अनेक प्रस्ताव येत आहेत.

यी ठिकाणी होणार्या साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष निवड करणे गरजेचे आहे. आपले साहित्य संमेलन हे सर्व क्षेत्रातील सर्वसामान्य लोकांसाठी व सर्व जाती धर्मा साठी खुले असते. आपल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कसे असावेत मा.संजय सोनवणी लेखक ईतिहास संशोधक यांच्या सारखे उच्च कोटीचे बौद्धिक समाजा साठी,लेखनी साठी आयुष्य समर्पण केलेले असावेत. मा.प्राचार्य आर एस चोपडे सर यांच्या सारखे असावेत. प्राचार्य आर एस चोपडे सर यांनी अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्था काढल्या या साठी आपल्या आयुष्याचा यज्ञ केला.

अध्यक्ष मा.आमदार रामहरी रुपनवर यांच्या सारखे असावेत ज्यांनी सर्व आयुष्य सामाजिक, राजकीय, साहित्यिक प्रबोधना साठी घालवले.

आपले सर्व अध्यक्ष उच्च विद्याविभूषीत, समाजा साठी समर्पित, सर्व सामान्य माणसाला आपले वाटणारे साहित्यिक क्षेत्रा बरोबर सामाजिक संवेदनशील असनारे असे आहेत व असावेत.अध्यक्ष पदा साठीचे मान्यवर हे,पत्रकारीता, साहित्य,संस्कृती, शिक्षण, प्रशासन, राजकारण किंवा कोणत्याही क्षेत्रातील असावेत त्यांनी समाजा साठी लेखन प्रबोधन केलेले असावे.

मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सर्व विभागातून अध्यक्ष पदासाठी नाव सुचवावे. तसेच अध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतरच साहित्य संमेलनाचे विषय व पुरस्कार निवड समिती जाहीर केली जाईल. तरी राज्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या आपल्या हक्काच्या व्यासपीठात सामील व्हावे.

खालील मान्यवराकडे फोन करुन नावे कळवावीत.
श्री गोविंद काळे
वरिष्ठ कवी,लेखक सोलापूर. 8459874278.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर
आमरावती.
राज्य सचिव. धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य
फोन 9423434223.
श्री बापूसाहेब हटकर.मुंबई. कवी,लेखक, नाटककार, अध्यक्ष धर्म पीठ.
फोन:7710020069,
श्री बिसलसिद्ध काळे लेखक व पत्रकार सोलापूर. प्रसिद्धी प्रमुख आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
फोन:9921018221′

READ MORE
Blog

सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन ता.चांदवड जि.नाशिक हे अभूतपूर्व होणार.

रविवार दिनांक ११/५/२०२५रोजी रंगमहाल ता.चांदवड जि.नाशिक येथे साहित्य संमेलन घेण्या साठी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. मोजकेच मान्यवर निमंत्रित केले होते.आयोजक होते दोन छावे श्री गणेश निंबाळकर, श्री समाधान बागल दोघे मित्र. मार्गदर्शक होते विनायक काळदाते. समाधान बागल आणि गणेश निंबाळकर हे हाडाचे समाज सेवक व प्रहार चे कार्येकर्ते आहेत. सामान्य कुटुंबातील ते पैशाने खूप श्रीमंत नाहीत. पण ते सामाजिक आणि राजकीय द्रुष्टया खूप श्रीमंत आहेत. कमी वयात त्यांनी समाज सेवेने अनेक लोक जोडले आहेत. गणेश निंबाळकर यांनी विधानसभा लढली आणि दोन नंबर ची ५६००० हजार छप्पन हजार मतदान घेतले. एकाकी लढून बाजार समितीत संचालक म्हणून निवडून आले आहेत. जनता हीच यांची श्रीमंती आहे. यांना लहान वयात नाशिक जिल्ह्य़ात कर्तव्याने प्रसिद्धी मिळाली आहे.

या ठिकाणी दुसरा एक चांगला अनुभव आला तो म्हणजे चांदवड चा चौथा स्तंभ म्हणजे प्रिंट मिडीयाचे पत्रकार. चांदवड ची पत्रकारीता म्हणजेच समाजाच्या प्रश्नाचा आरसाच. साहित्य संमेलनाच्या एका बैठकीतच चांदवड चा रंगमहाल (होळकर राजवाडा) महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर आला.पत्रकार गुजराथी यांनी ३०मे२०२५चा रंगमहालावरील लेख दैनिक लोकमत ने राज्य स्तरीय प्रसिद्ध केला. सर्व महाराष्ट्र राज्याने तो वाचला.
चांदवड ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची उपराजधानी. या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी स्वत:चे टाकसाळ ,नाणी तयार करण्याचा कारखाना उभारला होता.या ठिकाणी आयुध निर्माण कारखाना उभारला. रेणुका माता मंदिर जिर्णोद्धार केला. सर्वात महत्वाचे तिनशे वर्षां पूर्वी फक्त सागवान चे लाकूड वापरून सुंदर देखना असा रंगमहाल (राजवाडा) उभारला. ताजमहाल हा संगमरवरी फरशीने बांधकाम करून उभारण्यात आला.पण नैसर्गिक रित्या सागवानी लाकडावर सुंदर कोरीव नक्षीकाम करून उभारलेला हा रंगमहाल वास्तू कला आणि निसर्गाचा एक उक्त्रुष्ट सांस्कृतिक संगमच आहे.

धनगर समाजाचा ईतिहास आणि संस्कृती खुप मोठी आहे हे जपन्या साठी ,वारसा पुढे चालवण्या साठी साहित्य संमेलनाची गरज असते. साहित्य संमेलनासाठी, कला, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्र,ईतिहास, संशोधन, मिडीया,राजाश्रय याची आवश्यकता असते. वारसा चालवणारे वारस, सजग,बौद्धीक, नसतील फक्त गप्पा मारणारे असतील तर अतिक्रमण करुन किंवा झाकून ईतिहास नष्ट केला जातो.आज राजा हल सातवाहन पासून,चंद्रगुप्त मौर्य, आशोक सम्राट, होळकर शाही, शिंदे,भोसले, मा.स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे , मा.आमदार गणपतराव देशमुख पर्यंत चा ऐतिहासिक वारसा आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य हे चालवत आहे. चांदवड चे साहित्य संमेलन अभूतपूर्व होणार. धनगर जमातीचे एकमेव राष्ट्रीय व्यासपीठ आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य हेच आहे. लवकरच आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्याचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यात कोणतेही शासन धनगर जमातीला सक्षम करणार नाहित. देशातील लोकशाही संपत असताना
साहित्य संमेलनाची आणि देशातील सजग लोकांची जबाबदारी वाढत असते.आज देशात धर्मशाही आहे.राज्यात छुपा राजकीय जातीवाद होता तो आता उघड झाला आहे.राज्यात जमातीचे अनेक सामाजिक कार्य कर्ते आहेत पण त्यांनाही संरक्षण नाही. अनेक राजकीय कार्य कर्ते आहेत. त्यांनाही संरक्षण नाही. राज्यात एखादी संरक्षण समिती असायला पाहिजे.तरुणानी पुढे येऊन अशी एखादी समिती, परिषद स्थापन करावी.
लवकरच आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड महाराष्ट्र राज्य साठी अध्यक्ष निवड करण्यात येणार आहे नावे सुचवावीत. तसेच लवकरच संमेलनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड महाराष्ट्र राज्य हे अभूतपूर्व होणार हे नक्कीच. तसेच साहित्य संमेलना मध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करावा.

साहित्य संमेलन बैठकीस खालील मान्यवर उपस्थित होते व सर्वांनी मार्गदर्शन केले आहे.
श्री आर एस चोपडे सर. श्री संभाजीराव सुळ. श्री बाळासाहेब कर्णवर पाटील. श्री विनायक काळदाते, श्री समाधान बागल. श्री गणेश निंबाळकर.
श्री सोमनाथ कर्णवर पाटील.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे,श्री ज्ञानेश्वर ढेपले,श्री मच्छिंद्र बिडगर, श्री मुकुंद होळकर .श्री बिसलसिद्ध काळे. चांदवड चे सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

लेखक:
प्राचार्य डाॅ.अभिमन्यू टकले.
प्रसिद्धी प्रमुख: श्री बिसलसिद्ध काळे पत्रकार.

READ MORE
Blog

डाॅ. राजेंद्र शेंडगे ता.उमरगा जि.धाराशिव यांच्या कार्याचा परिचय.

पूर्वीचा उस्मानाबाद जिल्ह्य़ात सध्या धाराशिव ता.उमरगा येथील स्वर्गीय डाॅ.के.डी.शेंडगे हे नाव समाज सेवेत आणि वैद्यकीय क्षेत्रात खूपच प्रसिद्ध आहे.आजही सर्व पत्रकार, समाज सेवक त्यांना विसरू शकत नाहीत. डाॅ.के.डी.शेंडगे हे धनगर जमाती मध्ये समाज सेवक म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध होते. जो आवडे सर्वाना तो आवडे देवाला या उक्ती प्रमाणे ते कार्य करतच सोडून गेले.

त्यांचा वैद्यकीय सेवेचा व शैक्षणिक सेवेचा वारसा त्यांचे बंधू डाॅ. राजेंद्र(आरडी) शेंडगे व सर्व नातेवाईक चालवत आहेत. तसेच नुकत्याच तुळजापूर विधान सभा लढवलेल्या डाॅ. स्नेहा सोनकाटे या त्यांच्याच भाची.

डाॅ. आर.डी.शेंडगे हे एम.बी.बी.एस.व एम एस जनरल सर्जन आहेत. त्यांनी उमरगा येथे शंभर खाटांचे शेंडगे हाॅस्पीटल स्थापन केले.तसेच जय मल्हार बहु उद्देशीय संस्थेची स्थापना केली आहे. त्यांनी बालवाडी ते दहावीपर्यंत ईंग्लींश स्कूल ची स्थापना केली आहे. तसेच आकरावी व बारावी सायन्स व काॅमर्स काॅलेज ही काढलेले आहेत. तसेच या शिक्षणाची गुणवत्ताही सांभाळली आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी त्यांच्या बंधूच्या नावाने शासकीय मान्यता प्राप्त व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संलग्न डाॅ.के.डी. शेंडगे आयुर्वेदिक महाविद्यालय उमरगा हे सुरु केले आहे. दर वर्षी पन्नास आयुर्वेदिक डाॅक्टर बाहेर पडणार आहेत. तसेच त्यांनी शासन मान्य व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ संलग्न सुश्रुत बीएस्सी नर्सिंग काॅलेज उमरगा सीईटी काॅलेज कोड 09389 हे सुरू केले असून कॅप रांउड मध्ये प्रवेश चालू आहेत. तसेच डाॅ आर डी शेंडगे यांनी गेल्या वर्षी शासन मान्य जी एन एम तिन वर्षाचा नर्सिंग कोर्स सुरू केला आहे. या सर्व कोर्स ची दर वर्षी प्रवेश क्षमता पन्नास आहे. या ठीकाणी प्रवेश घेणार्या सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व सवलती आहेत . जीएनएम नर्सिंग ला आर्ट, काॅमर्स,सायन्स बारावी पास मुली मुले हा कोर्स करून आर्थिक द्रुष्टया स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात.प्रथम बॅचला पन्नास पैकी पन्नास विद्यार्थ्यी शिक्षण घेत आहेत.सध्या जीएनएम नर्सिंग दुसर्‍या बॅचचे प्रवेश चालू आहेत. राज्यभरातील गरजू बारावी पास आर्ट, काॅमर्स, सायन्स च्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे.समाजातील लोकांनी याचा लाभ घ्यावा.ही संस्था विकसनशील आहे . ही संस्था उभा करताना डाॅ. आर.डी.शेंडगे यांना अर्थातच अनेक सामाजिक, आर्थिक, शासकीय संघर्ष करावा लागला आहे. कोणत्याही प्रकारचा सामाजिक,आर्थिक राजकीय पाठीबां नसताना स्वबळावर मराठवाडय़ातील उमरग्या सारख्या ग्रामीण भागात डाॅ आर डी शेंडगे हे कार्य करत आहेत. मध्यमवर्गीय, गोरगरीब पालक आणि विद्यार्थ्यांना नाममात्र फी आकारून हमखास नोकरी उपलब्ध करून देणारे शिक्षण संस्थे मार्फत दिले जात आहेत. डाॅ.आर डी शेंडगे हे जमिनीवरून चालनारे डाॅक्टर आहेत. समाजाच्या कार्यात राज्यभर सक्रिय असतात.डाॅ शेॅडगे पहिल्या व दुसर्‍या साहित्य संमेलनाला सक्रिय सहभागी होते. हाॅस्पीटल व संस्थेमार्फत ग्रामीण भागात त्यांनी अनेक गरजू लोकांना वैद्यकीय सेवा व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या गरिब रुग्णांना मिळणार्या सर्व शासकीय सवलतीत मिळणारे उपचार व सेवा हाॅस्पीटल मध्ये उपलब्ध आहेत.

राज्यभरातील गरजू रुग्णानी व गरजू पालक, विद्यार्थ्यी, हितचिंतक यांनी नक्कीच डाॅ.आर डी शेंडगे यांना संपर्क करावा. संपर्का साठी भ्रमण ध्वनी: 9422464584/ 8626050262.
प्राचार्य डाॅ. अभिमन्यु टकले.

READ MORE
Blog

समाजासाठी काहीतरी करू शकलो याचे समाधान – डाॅ अभिमन्यु टकले

प्राचार्य श्री आर एस चोपडे सर. शिक्षण महर्षी. अध्यक्ष अहिल्या शिक्षण संस्था सांगली. अध्यक्ष चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य. यांच्या आम्रुत महोत्सवा निमित्त मी लेख लिहला तो महाराष्ट्र भर सर्व साहित्य प्रेमीनी दैनिकात आणि साप्ताहिकात छापला. सर्वाचे आभार. येथून पुढे आर एस चोपडे सरानां शिक्षण महर्षी या पदवीनेच सर्वत्र गौरविण्यात यावे तसा ठराव सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक येथे घेण्यात येईल.

तसेच दिनांक २०|६|२०२५ प्राचार्य डाॅ मधुकर सलगरे सर यांचा संपादकीय लेख व श्री भरतकुमार मोरे, उपसंपादक, दैनिक पुण्य नगरी यांनी माझ्या वाढदिवसा निमित्त घेतलेली मुलाकात आवश्य वाचा🙏

डाॅ अभिमन्यु टकले.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

READ MORE
Blog

दुष्काळी भागांतील विद्यार्थ्यांचा दीपस्तंभ प्राचार्य आर एस चोपडे सर

प्राचार्य डाॅ.अभिमन्यु टकले

संस्थापक धनगर धर्म पीठ/आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य 🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏
बॅरिस्टर टि के शेंडगे यांनी दुष्काळग्रस्त भागातील मुलामुलींना शिक्षण मिळावे या साठी महाराष्ट्र राज्यातील पहिली अहिल्या शिक्षण संस्थेची शाळा सुरू करुन ज्ञानाची ज्योत पेटवली. प्राचार्य आर एस चोपडे सर हे वयाच्या एकविसाव्या वर्षी १९७१ ला संस्थेत पहिले प्रशिक्षित शिक्षक म्हणून रूजू झाले.प्राचार्य चोपडे संरानी शैक्षणिक संस्थेची पालखी आपल्या खांद्यावर घेतली आणि बॅरिस्टर टि के शेंडगे यांनी पेटवलेल्या या ज्ञानाच्या ज्योतीला ज्योत पेटवत ज्ञानाची गंगा सांगली,सातारा, सोलापूर च्या दुष्काळी भागात नेली.पेटवलेल्या एका ज्योतीचे रुपांतर चोपडे संरानी दीपस्तंभात केले. दुष्काळी भागातील अनेक विद्यार्थ्याची कुटुंब या दीपस्तंभानी उजळून निघाली आहेत. अनेक विद्यार्थ्यी देश सेवा करत शैक्षणिक, औद्योगिक, संरक्षण, पोलीस, प्रशासकीय, सहकार, वैद्यकीय क्षेत्रात आपले कर्तव्य बजावत आहेत. संस्थेत बालवाडी पासून काॅलेज पर्यंत 33युनीट आहेत. ३०० शिक्षकव्रुंद आहेत. बारा हजार विद्यार्थ्यी शिक्षण घेत आहेत. संस्थेत १४ माध्यमिक विद्यालय आहेत.६कनिष्ट महाविद्यालय आहेत. १महाविद्यालय आहे.०५ प्राथमिक शाळा आहेत. ०४ वस्ती ग्रह आहेत. सीबीएसई नर्सरी ते दहावीपर्यंत शाळा आहे. तिनशे शिक्षक आहेत. चोपडे सर ३५वर्षे मुख्याध्यापक,१३वर्षे अहिल्या शिक्षण संस्थेचे सचिव होते.१८वर्षे झाले संस्थेचे कार्यकुशल अध्यक्ष आहेत.

अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कार्यात सहभागी आहेत. ३०/६/२००८ला सर सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ही तरुणाला लाजवेल असे कार्य करीत आहेत. २०१७ पासून म्हणजे पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य मध्ये सहभागी आहेत. २०१९ला तिसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य मध्ये सर सक्रिय सहभागी झाले.

सरांनी अनेक संस्थेचे अंक सपांदित प्रसिद्ध केले आहेत. ३००वर लेख लिहिले आहेत.संरानी प्रेमाचे झरे नावाचे आत्मकथन लिहिले आहे.संराच्या या शैक्षणिक,सामाजिक, साहित्यिक प्रकाशमय कर्तृत्वाचा विचार करून चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य अध्यक पदी निवड झाली. सांगोला वासीया बरोबर तीन दिवस धूमधडाक्यात साहित्य संमेलन घेतले आणि सर्व माणदेश उजळून निघाला.

ग्रामीण भागातील समाज सेवकाना विश्वासात घेऊन,शिक्षकांना मार्गदर्शन करत अहिल्या शिक्षण संस्था दिप समई सारखी कार्य करत आहे.

विद्यार्थ्यी समईतील तेला सारखे कार्य करत आहेत .

संस्थेतील शिक्षक समईतील वाती सारखे जळत कष्ट करत आहेत. संस्थेचे अध्यक्ष चोपडे सर दिप समई ची ज्योत बनून दिप स्तंभासारखे मार्गदर्शन करत आहेत.प्राचार्य आर एस चोपडे सर यांचा आम्रुत महोत्सवी वाढदिवस रविवार दि.१५/०६/२०२५ संस्था व माजी विद्यार्थ्यी साजरा करत आहेत. संराचे अभिनंदन. प्राचार्य आर एस चोपडे सर आप जिवो हजारो साल. साल के दिन हो पचास हजार.

READ MORE