Blog

डाॅ अभिमन्यू टकले यांचा जमातीच्या वतीने नागपूर येथे सत्कार

स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख स्मरणार्थ चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला २३|२४जुलै२०२२ प्रचंड यशस्वी झाले.याची दखल महाराष्ट्र राज्यातील बौद्धिक जनतेने व काही प्रिंट मिडीयाने,सोसेल मिडीयानेही घेतली गेली आहे.भरगच्च प्रतीसादात,प्रचंड अशा उत्साही वातावरणात, हे संमेलन पार पडले.हा कार्यक्रम राज्यातील सर्व क्षेत्रातील जमातीने अगदी स्वत च्या खांद्यावर घेतला आहे.सर्व राज्यातून कौतुकाचा वर्षांव होत आहे. अनेक लेखक या ऐतिहासिक कार्याचे लीखान करू ईछीत आहेत.खरोखरच हे विचार पीठ लोकांचे झाले आहे. सर्वानाच आपले वाटू लागले आहे.या प्रेमाच्या भावनेतूनच आज डाॅ अभिमन्यु टकले संस्थापक अध्यक्ष धनगर साहित्य संमेलन व धनगर धर्म पीठ यांचा नागपूर येथील गणगोता कडून सत्कार करण्यात आला. श्री शिवकुमार आवझे व सौ कांचन आवझे यांनी हे आयोजन केले पहिला सत्कार ही केला. श्री धनराज खडसे सर कवी, सौ विद्या खडसे यांनीही सत्कार केला .श्री दुर्गेश महाजन व डाॅ सौ रक्षा महाजन लेखीका.यांनीही सत्कार केला. श्री खुशाल तांबडे,श्री उत्तम सुरनर यांनीही सत्कार केला. सर्वानी मनोगत व्यक्त केले. शुभेच्छा. दिल्या. जमातीने एकत्र येऊन आरक्षण घेतले पाहिजे व सर्वानी प्रयत्न केले पाहिजेत ही भूमीका मांडली. श्री धनराज खडसे सर यांनी डाॅ अभिमन्यु टकले यांच्यावर एक स्वरचित काव्य सादर केले.मा. डॉ. अभिमन्यु टकले सर…
यांना समर्पित…
————————————-
असतात काही माणसं ध्येय-वेडी,
आजपावेतो होते केवळ ऐकिवात…

आता घेतलाय अनुभव प्रत्यक्षात,
टकले सर साक्षात तुमच्या रुपात…

जीवनाच्या त्या प्रत्येक वळणावर,
माणूस माणसाशी जोडत गेलात…

जोडलीत माणसं जिंकलीत मनं,
नैराश्यात जागृत केलं आत्मभान…

निद्रावस्थेतील सुस्त समाजात,
जागवलात आशेचा नवं-किरण…

अहःर्निश मनी तो एकचि ध्यास,
कार्यसिद्धीचा उत्स्फूःर्त उल्हास…

अभिमन्यु म्हणावं की एकलव्य,
स्वप्न मनी बाळगलं भव्य-दिव्य…

अज्ञानावर सोकावला होता काळ,
शालीनतेनं सांधली भंगलेली नाळ…

सारस्वतांचा नित्य भरवूनी मेळा,
निर्मिलात अमृतमंथनी गोतावळा…

संमेलनी होऊ लागले चिंतन-मनन,
तृष्णातूरां मुखी जणूच ते अमृत-पान…
————————————-
शब्दांकनः धनराज खडसे, नागपूर.
डाॅ अभिमन्यु टकले सत्काराला उत्तर देताना म्हणाले गणगोताने केलेला सत्काराचा आनंद हा वेगळाच आसतो. आपण एकत्र येत आहोत. आपण एकत्र आलो तर आपण आपल्या सर्व समस्या सोडवू शकतो.

सौ विद्या खडशे यांनी आभार प्रदर्शन केले.

READ MORE
Blog

सांगोला येथे ४थे स्व.भाई गणपतरावजी देशमुख आदिवसी धनगर साहित्य संमेलन मोठ्या जल्लोषात

सांगोला येथे ४थे स्व.भाई गणपत रावजी देशमुख आदिवसी धनगर साहित्य संमेलन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन मध्ये मोठ्या जल्लोषात पार पडले.दोन दिवसीय या संमेलनात पहिल्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व डाक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास संमेलन अध्यक्ष आर. एस.चोपडे व कार्यकारणीनी पुष्प हार अर्पण करुन ग्रंथ दिंडीने संमेलनाची अत्यंत उत्साहात,जल्लोषात सुरुवात झाली.

ग्रंथदिंडी मध्ये अनेक शालेय मुलामुलींनी लेझीम,धनगरी गजनृत्य,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा,बापू वाटेगावकर वेशभूषा, वाघ्या मुरली वेशभूषा, खंडोबा बानू वेशभूषा, वारकरी वेशभूषा, अशा प्रकारच्या लक्षवेधक रैली ने संपूर्ण सांगोला शहराचे लक्ष वेधले .उदघाटनाच्या वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्यास व स्व.भाई गणपतरावजी देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलीत केले.कोरोनाने मरण पावलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.प्रा.संजय शिंगाडे सरांनी मार्मिक वेधक प्रास्ताविक केले.संमेलन अध्यक्ष आर. एस चोपडे यांनीं आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की,” आजच्या तरुणानी येळकोट, येळकोट जय मल्हार चा आवाज वाढवावा,आतापर्यंत ७५ वर्षाच्या कालावधीत आपले २ खासदार व २०आमदार झाले याचा विचार करणे गरजेचे आहे. विधानसभेत व लोकसभेत आपले लोक कमी असल्यामुळें आपल्या समाजाचे प्रश्न सुटत नाहीत. धनगर समाजाची निरपक्षीय संघटना व्हायला पाहिजे.”या वेळी धनगर समाजाच्या साहित्यिकांची काही पुस्तके मान्यवरांचे हस्ते प्रकाशित करण्यात आली. तर काही मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. नंतरच्या सत्रात शालेय मुलामुलींच्या सांस्कृतीक कार्यक्रमाने भरपूर मनोरंजन केले.कविसंमेलनात अनेक कवी वकवयित्रीनी सकस,दर्जेदार कवीता सादर केल्या,एकंदरींत या संमेलनात मनोरंजना बरोबरच वैचारीक माहिती ही मिळाल्याने धनगर समाज बांधव तृप्त झाला.उदघाटनाच्या वेळी श्रीमती रतन गणपतराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, बाबासाहेब देशमुख तहसिलदार अभिजीत पाटील,संस्थापक अभिमन्यु टकले सर,मुख्याधिकारी कैलास केंद्रे,बाळासाहेब करनवर,राणीताई माने,संमेलन अध्यक्ष आर. एस.चोपडे, स्वागताध्यक्ष प्रा.संजय शिंगाडे,प्रा.यशपाल भिंगे सर अमोल पांढरे आदि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातून विविध भागातून साहित्यिक पत्रकार व समाज बांधव उपस्थित होते.

READ MORE
Blog

आदीवासी धनगर साहित्य संमेलनाला उपस्थित राहा

चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार व रविवार दिनांक २३ व २४ जुलै २०२२ रोजी सांगोला जि.सोलापुर येथे होणार आहे. या साहित्य संमेलनाला देशभरातून जास्तीत जास्त समाज बांधव, भगिनींनी उपस्थित राहण्याचे आव्हान धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे पवन थोटे यांनी केले, या साहित्य संमेलन संस्थापक डॉ. अभिमन्यु टकले आहेत,या संमेलनाचे अध्यक्ष श्री.आर.एस.चोपड़े अहिल्या शिक्षण संस्था सांगलीचे अध्यक्ष आहेत.प्रा.संजय सिंगाड़े सर हे स्वागत अध्यक्ष आहेत.
पाहिले साहित्य संमेलन २०१७ ला सोलापुर येथे झाले। दूसरे साहित्य सम्मेलन २०१८ ला लातूर येथे झाले। तीसरे साहित्य सम्मलेन म्हसवड जि सातारा येथे २०१९ला झाले। चौथे साहित्य सम्मलेन मा आमदार गणपतराव देशमुख यांच्या म्हणण्यानुसार संगोला येथे जाहीर झाले होते। पूर्ण तैयारी झाली होती। पण कोविड १९ मुळे स्थगित करण्यात आले होते ‘ हे सम्मलेन स्वर्गीय गाणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ होणार आहे,सर्व साहित्य सम्मेलन तीन दिवसाची झाली आहेत. २५ ते ३० हजार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देशभरतुन हजेरी लावलेली आहे, या सम्मेलनास किमान ४० हजार विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावण्याची आपेक्षा आहे, या संमेलनात दोन दिवस भरगच्च असे कार्यक्रम आहेत,उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते,खा.डॉ.विकासजी महात्मे, आ. राम शिंदे, श्रीमती रतन गणपतराव आ.प्रशांत परिचारक.गोपीचंद पडळकर,आ.सुभाष देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, श्री. गणेश हाके, मा.आ.रामराव वडकुते,मा.आ. विजय देशमुख,श्री.चंद्रकांतदादा देशमुख,डॉ.बाबासाहेब देशमुख,राणी माने,आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल,भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल, यामध्ये नविन साहितिकांच्या साहित्याचे प्रकाशन होईल,शिक्षण साहित्य पत्रकारिता वैद्यकीय सामाजिक प्रशासन क्षेत्रातील १० आदर्श मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल,स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख आदर्श आमदार पुरस्कार देण्यात येईल. तसेच भारत देश्यातील एक आदर्श लोकसेवक मुख्यमंत्री यांची निवड करणार आहोत आणि एक लक्ष रुपये शाल,श्रीफळ,काठि, घोंगडी देऊन धनगर जमाती मार्फ़त पुरस्कार देऊन भव्य सत्कार करण्यात येईल. सम्मलेन अध्यक्ष यांचे भाषण झाल्यानंतर उद्घाटन सोहळा संपेल.रविवार दिनांक २४/७/२०२२ रोजी दिवसभर परिसवांद चर्चा सत्र अणि व्याख्याने होतील, त्यानंतर समारोप सोहळा नवी दिल्लीचे मुख्यमंत्री श्री.अरविंदजी केजरीवाल,आ.दिनेश मोहनिया नवी दिल्ली,संमेलनाध्यक्ष श्री.आर.एस. चोपडे,आ.दत्तामामा भरणे,आ. शहाजीबापू पाटील,मा.मंत्री, अण्णासाहेब डांगे,मा.आ.रामहरी रुपनवर,मा.आ.महादेवजी जानकर,मा.आ.प्रकाशअण्णा शेंडगे, मा.आ.हरिदास भदे,मा.आ. नारायणआबा पाटील,मा.आ.रमेश शेंडगे,श्री.विष्णू माने,संस्थापक अध्यक्ष डॉ.अभिमन्यू टकले,प्रा. संजय शिंगाडे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत समारोपीय कार्यक्रम होणार आहे,यवतमाळ जिल्ह्यातील व राज्यातील सर्व क्षेत्रातील सन्माननीय मान्यवर यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन समाजाचे नेते श्री.पांडुरंगजी खांदवे,श्री.वसंतराव ढोके,श्री.श्रीधर मोहोड,श्री.राजेश गायनर,धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे श्री.पवन थोटे,व संयोजन समिती मार्फत करण्यात येत.

READ MORE
Blog

आदिवासी धनगर साहित्य संमेलन, सांगोला

जनोपचार,सांगोला मे होने जा रहे आदिवासी धनगर साहित्य संमेलन मे राज्यके सभी हिस्सो से सहभागी होने कि अपिल डॉक्टर अभिमन्यू टकले इंहोने की

तेईस जुलै को यह संमेलन होणे जा रहा है

विविध क्षेत्रो से चालीस हजार से ज्यादा लोग संमेलम मे संमिलीत होनेकी जनकारी भी पत्रकार परिषद मे दि गयी

इस वक्त अशोक हटकर, शरद वासतकार इनकी उपस्थिती थी

READ MORE
Blog

पत्रकार परिषद खामगाव जि बुलढाणा श्री आशोक हटकर साहेब समाज सेवक आदिवासी धनगर साहित्य संमेलन २३|२४जुलै २०२२ सांगोला महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेत मनोगत व्यक्त करताना

पत्रकार परिषद खामगाव जि बुलढाणा श्री आशोक हटकर साहेब समाज सेवक, सभापती बाजार समिती, खामगाव जि बुलढाणा, यांनी आज आदिवासी धनगर साहित्य संमेलन २३|२४जुलै २०२२सांगोला महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेत मनोगत व्यक्त करताना.

READ MORE