Blog

सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन ता.चांदवड जि.नाशिक हे अभूतपूर्व होणार.

रविवार दिनांक ११/५/२०२५रोजी रंगमहाल ता.चांदवड जि.नाशिक येथे साहित्य संमेलन घेण्या साठी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. मोजकेच मान्यवर निमंत्रित केले होते.आयोजक होते दोन छावे श्री गणेश निंबाळकर, श्री समाधान बागल दोघे मित्र. मार्गदर्शक होते विनायक काळदाते. समाधान बागल आणि गणेश निंबाळकर हे हाडाचे समाज सेवक व प्रहार चे कार्येकर्ते आहेत. सामान्य कुटुंबातील ते पैशाने खूप श्रीमंत नाहीत. पण ते सामाजिक आणि राजकीय द्रुष्टया खूप श्रीमंत आहेत. कमी वयात त्यांनी समाज सेवेने अनेक लोक जोडले आहेत. गणेश निंबाळकर यांनी विधानसभा लढली आणि दोन नंबर ची ५६००० हजार छप्पन हजार मतदान घेतले. एकाकी लढून बाजार समितीत संचालक म्हणून निवडून आले आहेत. जनता हीच यांची श्रीमंती आहे. यांना लहान वयात नाशिक जिल्ह्य़ात कर्तव्याने प्रसिद्धी मिळाली आहे.

या ठिकाणी दुसरा एक चांगला अनुभव आला तो म्हणजे चांदवड चा चौथा स्तंभ म्हणजे प्रिंट मिडीयाचे पत्रकार. चांदवड ची पत्रकारीता म्हणजेच समाजाच्या प्रश्नाचा आरसाच. साहित्य संमेलनाच्या एका बैठकीतच चांदवड चा रंगमहाल (होळकर राजवाडा) महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर आला.पत्रकार गुजराथी यांनी ३०मे२०२५चा रंगमहालावरील लेख दैनिक लोकमत ने राज्य स्तरीय प्रसिद्ध केला. सर्व महाराष्ट्र राज्याने तो वाचला.
चांदवड ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची उपराजधानी. या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी स्वत:चे टाकसाळ ,नाणी तयार करण्याचा कारखाना उभारला होता.या ठिकाणी आयुध निर्माण कारखाना उभारला. रेणुका माता मंदिर जिर्णोद्धार केला. सर्वात महत्वाचे तिनशे वर्षां पूर्वी फक्त सागवान चे लाकूड वापरून सुंदर देखना असा रंगमहाल (राजवाडा) उभारला. ताजमहाल हा संगमरवरी फरशीने बांधकाम करून उभारण्यात आला.पण नैसर्गिक रित्या सागवानी लाकडावर सुंदर कोरीव नक्षीकाम करून उभारलेला हा रंगमहाल वास्तू कला आणि निसर्गाचा एक उक्त्रुष्ट सांस्कृतिक संगमच आहे.

धनगर समाजाचा ईतिहास आणि संस्कृती खुप मोठी आहे हे जपन्या साठी ,वारसा पुढे चालवण्या साठी साहित्य संमेलनाची गरज असते. साहित्य संमेलनासाठी, कला, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्र,ईतिहास, संशोधन, मिडीया,राजाश्रय याची आवश्यकता असते. वारसा चालवणारे वारस, सजग,बौद्धीक, नसतील फक्त गप्पा मारणारे असतील तर अतिक्रमण करुन किंवा झाकून ईतिहास नष्ट केला जातो.आज राजा हल सातवाहन पासून,चंद्रगुप्त मौर्य, आशोक सम्राट, होळकर शाही, शिंदे,भोसले, मा.स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे , मा.आमदार गणपतराव देशमुख पर्यंत चा ऐतिहासिक वारसा आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य हे चालवत आहे. चांदवड चे साहित्य संमेलन अभूतपूर्व होणार. धनगर जमातीचे एकमेव राष्ट्रीय व्यासपीठ आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य हेच आहे. लवकरच आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्याचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यात कोणतेही शासन धनगर जमातीला सक्षम करणार नाहित. देशातील लोकशाही संपत असताना
साहित्य संमेलनाची आणि देशातील सजग लोकांची जबाबदारी वाढत असते.आज देशात धर्मशाही आहे.राज्यात छुपा राजकीय जातीवाद होता तो आता उघड झाला आहे.राज्यात जमातीचे अनेक सामाजिक कार्य कर्ते आहेत पण त्यांनाही संरक्षण नाही. अनेक राजकीय कार्य कर्ते आहेत. त्यांनाही संरक्षण नाही. राज्यात एखादी संरक्षण समिती असायला पाहिजे.तरुणानी पुढे येऊन अशी एखादी समिती, परिषद स्थापन करावी.
लवकरच आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड महाराष्ट्र राज्य साठी अध्यक्ष निवड करण्यात येणार आहे नावे सुचवावीत. तसेच लवकरच संमेलनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड महाराष्ट्र राज्य हे अभूतपूर्व होणार हे नक्कीच. तसेच साहित्य संमेलना मध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करावा.

साहित्य संमेलन बैठकीस खालील मान्यवर उपस्थित होते व सर्वांनी मार्गदर्शन केले आहे.
श्री आर एस चोपडे सर. श्री संभाजीराव सुळ. श्री बाळासाहेब कर्णवर पाटील. श्री विनायक काळदाते, श्री समाधान बागल. श्री गणेश निंबाळकर.
श्री सोमनाथ कर्णवर पाटील.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे,श्री ज्ञानेश्वर ढेपले,श्री मच्छिंद्र बिडगर, श्री मुकुंद होळकर .श्री बिसलसिद्ध काळे. चांदवड चे सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

लेखक:
प्राचार्य डाॅ.अभिमन्यू टकले.
प्रसिद्धी प्रमुख: श्री बिसलसिद्ध काळे पत्रकार.

READ MORE
Blog

डाॅ. राजेंद्र शेंडगे ता.उमरगा जि.धाराशिव यांच्या कार्याचा परिचय.

पूर्वीचा उस्मानाबाद जिल्ह्य़ात सध्या धाराशिव ता.उमरगा येथील स्वर्गीय डाॅ.के.डी.शेंडगे हे नाव समाज सेवेत आणि वैद्यकीय क्षेत्रात खूपच प्रसिद्ध आहे.आजही सर्व पत्रकार, समाज सेवक त्यांना विसरू शकत नाहीत. डाॅ.के.डी.शेंडगे हे धनगर जमाती मध्ये समाज सेवक म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध होते. जो आवडे सर्वाना तो आवडे देवाला या उक्ती प्रमाणे ते कार्य करतच सोडून गेले.

त्यांचा वैद्यकीय सेवेचा व शैक्षणिक सेवेचा वारसा त्यांचे बंधू डाॅ. राजेंद्र(आरडी) शेंडगे व सर्व नातेवाईक चालवत आहेत. तसेच नुकत्याच तुळजापूर विधान सभा लढवलेल्या डाॅ. स्नेहा सोनकाटे या त्यांच्याच भाची.

डाॅ. आर.डी.शेंडगे हे एम.बी.बी.एस.व एम एस जनरल सर्जन आहेत. त्यांनी उमरगा येथे शंभर खाटांचे शेंडगे हाॅस्पीटल स्थापन केले.तसेच जय मल्हार बहु उद्देशीय संस्थेची स्थापना केली आहे. त्यांनी बालवाडी ते दहावीपर्यंत ईंग्लींश स्कूल ची स्थापना केली आहे. तसेच आकरावी व बारावी सायन्स व काॅमर्स काॅलेज ही काढलेले आहेत. तसेच या शिक्षणाची गुणवत्ताही सांभाळली आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी त्यांच्या बंधूच्या नावाने शासकीय मान्यता प्राप्त व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संलग्न डाॅ.के.डी. शेंडगे आयुर्वेदिक महाविद्यालय उमरगा हे सुरु केले आहे. दर वर्षी पन्नास आयुर्वेदिक डाॅक्टर बाहेर पडणार आहेत. तसेच त्यांनी शासन मान्य व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ संलग्न सुश्रुत बीएस्सी नर्सिंग काॅलेज उमरगा सीईटी काॅलेज कोड 09389 हे सुरू केले असून कॅप रांउड मध्ये प्रवेश चालू आहेत. तसेच डाॅ आर डी शेंडगे यांनी गेल्या वर्षी शासन मान्य जी एन एम तिन वर्षाचा नर्सिंग कोर्स सुरू केला आहे. या सर्व कोर्स ची दर वर्षी प्रवेश क्षमता पन्नास आहे. या ठीकाणी प्रवेश घेणार्या सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व सवलती आहेत . जीएनएम नर्सिंग ला आर्ट, काॅमर्स,सायन्स बारावी पास मुली मुले हा कोर्स करून आर्थिक द्रुष्टया स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात.प्रथम बॅचला पन्नास पैकी पन्नास विद्यार्थ्यी शिक्षण घेत आहेत.सध्या जीएनएम नर्सिंग दुसर्‍या बॅचचे प्रवेश चालू आहेत. राज्यभरातील गरजू बारावी पास आर्ट, काॅमर्स, सायन्स च्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे.समाजातील लोकांनी याचा लाभ घ्यावा.ही संस्था विकसनशील आहे . ही संस्था उभा करताना डाॅ. आर.डी.शेंडगे यांना अर्थातच अनेक सामाजिक, आर्थिक, शासकीय संघर्ष करावा लागला आहे. कोणत्याही प्रकारचा सामाजिक,आर्थिक राजकीय पाठीबां नसताना स्वबळावर मराठवाडय़ातील उमरग्या सारख्या ग्रामीण भागात डाॅ आर डी शेंडगे हे कार्य करत आहेत. मध्यमवर्गीय, गोरगरीब पालक आणि विद्यार्थ्यांना नाममात्र फी आकारून हमखास नोकरी उपलब्ध करून देणारे शिक्षण संस्थे मार्फत दिले जात आहेत. डाॅ.आर डी शेंडगे हे जमिनीवरून चालनारे डाॅक्टर आहेत. समाजाच्या कार्यात राज्यभर सक्रिय असतात.डाॅ शेॅडगे पहिल्या व दुसर्‍या साहित्य संमेलनाला सक्रिय सहभागी होते. हाॅस्पीटल व संस्थेमार्फत ग्रामीण भागात त्यांनी अनेक गरजू लोकांना वैद्यकीय सेवा व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या गरिब रुग्णांना मिळणार्या सर्व शासकीय सवलतीत मिळणारे उपचार व सेवा हाॅस्पीटल मध्ये उपलब्ध आहेत.

राज्यभरातील गरजू रुग्णानी व गरजू पालक, विद्यार्थ्यी, हितचिंतक यांनी नक्कीच डाॅ.आर डी शेंडगे यांना संपर्क करावा. संपर्का साठी भ्रमण ध्वनी: 9422464584/ 8626050262.
प्राचार्य डाॅ. अभिमन्यु टकले.

READ MORE
Blog

समाजासाठी काहीतरी करू शकलो याचे समाधान – डाॅ अभिमन्यु टकले

प्राचार्य श्री आर एस चोपडे सर. शिक्षण महर्षी. अध्यक्ष अहिल्या शिक्षण संस्था सांगली. अध्यक्ष चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य. यांच्या आम्रुत महोत्सवा निमित्त मी लेख लिहला तो महाराष्ट्र भर सर्व साहित्य प्रेमीनी दैनिकात आणि साप्ताहिकात छापला. सर्वाचे आभार. येथून पुढे आर एस चोपडे सरानां शिक्षण महर्षी या पदवीनेच सर्वत्र गौरविण्यात यावे तसा ठराव सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक येथे घेण्यात येईल.

तसेच दिनांक २०|६|२०२५ प्राचार्य डाॅ मधुकर सलगरे सर यांचा संपादकीय लेख व श्री भरतकुमार मोरे, उपसंपादक, दैनिक पुण्य नगरी यांनी माझ्या वाढदिवसा निमित्त घेतलेली मुलाकात आवश्य वाचा🙏

डाॅ अभिमन्यु टकले.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

READ MORE
Blog

दुष्काळी भागांतील विद्यार्थ्यांचा दीपस्तंभ प्राचार्य आर एस चोपडे सर

प्राचार्य डाॅ.अभिमन्यु टकले

संस्थापक धनगर धर्म पीठ/आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य 🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏
बॅरिस्टर टि के शेंडगे यांनी दुष्काळग्रस्त भागातील मुलामुलींना शिक्षण मिळावे या साठी महाराष्ट्र राज्यातील पहिली अहिल्या शिक्षण संस्थेची शाळा सुरू करुन ज्ञानाची ज्योत पेटवली. प्राचार्य आर एस चोपडे सर हे वयाच्या एकविसाव्या वर्षी १९७१ ला संस्थेत पहिले प्रशिक्षित शिक्षक म्हणून रूजू झाले.प्राचार्य चोपडे संरानी शैक्षणिक संस्थेची पालखी आपल्या खांद्यावर घेतली आणि बॅरिस्टर टि के शेंडगे यांनी पेटवलेल्या या ज्ञानाच्या ज्योतीला ज्योत पेटवत ज्ञानाची गंगा सांगली,सातारा, सोलापूर च्या दुष्काळी भागात नेली.पेटवलेल्या एका ज्योतीचे रुपांतर चोपडे संरानी दीपस्तंभात केले. दुष्काळी भागातील अनेक विद्यार्थ्याची कुटुंब या दीपस्तंभानी उजळून निघाली आहेत. अनेक विद्यार्थ्यी देश सेवा करत शैक्षणिक, औद्योगिक, संरक्षण, पोलीस, प्रशासकीय, सहकार, वैद्यकीय क्षेत्रात आपले कर्तव्य बजावत आहेत. संस्थेत बालवाडी पासून काॅलेज पर्यंत 33युनीट आहेत. ३०० शिक्षकव्रुंद आहेत. बारा हजार विद्यार्थ्यी शिक्षण घेत आहेत. संस्थेत १४ माध्यमिक विद्यालय आहेत.६कनिष्ट महाविद्यालय आहेत. १महाविद्यालय आहे.०५ प्राथमिक शाळा आहेत. ०४ वस्ती ग्रह आहेत. सीबीएसई नर्सरी ते दहावीपर्यंत शाळा आहे. तिनशे शिक्षक आहेत. चोपडे सर ३५वर्षे मुख्याध्यापक,१३वर्षे अहिल्या शिक्षण संस्थेचे सचिव होते.१८वर्षे झाले संस्थेचे कार्यकुशल अध्यक्ष आहेत.

अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कार्यात सहभागी आहेत. ३०/६/२००८ला सर सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ही तरुणाला लाजवेल असे कार्य करीत आहेत. २०१७ पासून म्हणजे पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य मध्ये सहभागी आहेत. २०१९ला तिसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य मध्ये सर सक्रिय सहभागी झाले.

सरांनी अनेक संस्थेचे अंक सपांदित प्रसिद्ध केले आहेत. ३००वर लेख लिहिले आहेत.संरानी प्रेमाचे झरे नावाचे आत्मकथन लिहिले आहे.संराच्या या शैक्षणिक,सामाजिक, साहित्यिक प्रकाशमय कर्तृत्वाचा विचार करून चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य अध्यक पदी निवड झाली. सांगोला वासीया बरोबर तीन दिवस धूमधडाक्यात साहित्य संमेलन घेतले आणि सर्व माणदेश उजळून निघाला.

ग्रामीण भागातील समाज सेवकाना विश्वासात घेऊन,शिक्षकांना मार्गदर्शन करत अहिल्या शिक्षण संस्था दिप समई सारखी कार्य करत आहे.

विद्यार्थ्यी समईतील तेला सारखे कार्य करत आहेत .

संस्थेतील शिक्षक समईतील वाती सारखे जळत कष्ट करत आहेत. संस्थेचे अध्यक्ष चोपडे सर दिप समई ची ज्योत बनून दिप स्तंभासारखे मार्गदर्शन करत आहेत.प्राचार्य आर एस चोपडे सर यांचा आम्रुत महोत्सवी वाढदिवस रविवार दि.१५/०६/२०२५ संस्था व माजी विद्यार्थ्यी साजरा करत आहेत. संराचे अभिनंदन. प्राचार्य आर एस चोपडे सर आप जिवो हजारो साल. साल के दिन हो पचास हजार.

READ MORE
Blog

चांदवड येथील ६ व्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनास तालुक्यातील समाज बांधवांनी उपस्थितीत राहावे- संभाजीराव सुळ..

करमाळा -प्रतिनीधी..

साहित्यिक विचाराने माणूस घडतो विचारांचे मंथन करण्यासाठी साहित्य संमेलने आयोजित करणे आवश्यक असल्याचे मत लातूर येथील उद्योगपती संभाजीराव सूळ यांनी व्यक्त केले ते चांदवड जिल्हा नाशिक येथे होणाऱ्या सहा वे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी डॉ अभिमन्यू टकले हे होते पुढे बोलताना श्री सूळ म्हणाले की ज्या ज्या समाजांनी पुस्तके हाती घेतली तोच समाज क्रांती करू शकला साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपली मूळ ओळख रीती रिवाज चालीरीती परंपरा महापुरुषांचे योगदान व त्यांच्या योगदानामुळे राष्ट्र निर्माण करणे कामी त्यांचा असणारा वाटा आपल्या नव्या पिढीला कळणार आहे यामुळे महाराष्ट्रातील तमाम बांधवांनी हे साहित्य संमेलन यशस्वी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले
आज करमाळा के, हाईट्स येथे आढावा बैठक संपन्न झाली यावेळी धनगर साहित्य संमेलन संस्थापक अध्यक्ष डॉ.अभिमन्यू टकले व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष उद्योगपती संभाजीराव सुळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाळा येथे आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी संभाजीराव सुळ, डॉ.अभिमन्यू टकले यांचा सकल धनगर समाज करमाळा तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आदिवासी धनगर साहित्य संमेलन व धनगर समाजाची आसलेली पिछेहाट, धनगर आरक्षण आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंती सह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी धनगर धर्म पिठाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब टकले, राष्ट्रीय समाज पक्षाचे मा.जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, भाजप किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकूर, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शुभम बंडगर, दैनिक संचार चे पत्रकार काळे साहेब, रासपचे विधानसभा अध्यक्ष शंकर सूळ , प्रगतशील बागायतदार पप्पू सलगर, उद्योजक अशोक जाधव, श्रीराम देवकाते , रासप ता.संपर्क प्रमुख विकास मेरगळ, बाबासाहेब चौगुले , आशिष बंडगर आदी मान्यवर उपस्थितीत होते.

READ MORE
Blog

ऐतिहासिक सहावे धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य

नियोजन बैठक 🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जंयती निमित्त ऐतिहासिक सहावे धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य घेपले जानार आहे.
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक, साहित्य, संस्कृती,धर्म शैक्षणिक क्षेत्रातील आवड असलेल्या सर्व मान्यवरांना कळवण्यात येते की रविवार दिनांक ११/०५/२०२५ रोजी सकाळी नाशिक व चांदवड मधील मान्यवराच्या गाटीभेटी घेणे व पत्रकार परिषद व सायकांळी धनगर साहित्य संमेलन बैठक व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंती निमित्त प्रतीमा पुजन होईल.

नियोजनाचे विषय
१) स्थळ ठरवने,२) संमेलन दिनांक ठरवणे, ३) संमेलन अध्यक्ष ठरवणे, ४)स्वागताध्यक्ष ठरवणे,५)कार्यक्रम रूपरेषा ठरवणे, ६) साहित्य संमेलनाची जबाबदार समिती ठरवणे. अध्यक्ष च्या परवानगीने आलेल्या विषयावर चर्चा करणे.ई.
श्री विनायक काळदाते कार्याध्यक्ष धनगर धर्मपीठ महाराष्ट्र राज्य यांनी व श्री समाधान बागल समाज सेवक नाशिक यांनी बैठकीचे आयोजन व नियोजन केले आहे.खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत मा. अध्यक्ष मा.आमदार रामहरी रुपनवर माळशिरस , उपाध्यक्ष श्री संभाजीराव सुळ लातूर,
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सचिव आमरावती.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील राजेवाडी,
श्री आर एस चोपडे सर चौथे अध्यक्ष सांगली
श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपीआय ठाणे.
श्री संजय शिंगाडे सर सांगोला, ,
श्री उज्ज्वलकुमार माने संपादक लेखक सोलापूर
डाॅ स्नेहा सोनकाटे तुळजापूर.
श्री बिसलसिद्ध काळे पत्रकार,
श्री हनमंतराव चौरे सातारा,.
श्री चंद्रकांत हजारे प्रवक्ते

डाॅ अभिमन्यू टकले
संस्थापक धर्मपीठ महाराष्ट्र राज्य.
आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य

READ MORE
Blog

ऐतिहासिक सहावे धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य

नियोजन बैठक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जंयती निमित्त ऐतिहासिक सहावे धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य घेतले जानार आहे.

महाराष्ट्र राज्यातील सामाजिक, साहित्य, संस्कृती,धर्म शैक्षणिक क्षेत्रातील आवड असलेल्या सर्व मान्यवरांना कळवण्यात येते की रविवार दिनांक ११/०५/२०२५ रोजी सकाळी नाशिक व चांदवड मधील मान्यवराच्या गाटीभेटी घेणे व पत्रकार परिषद व सायकांळी धनगर साहित्य संमेलन बैठक व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंती निमित्त प्रतीमा पुजन होईल.

नियोजनाचे विषय
१) स्थळ ठरवने,२) संमेलन दिनांक ठरवणे, ३) संमेलन अध्यक्ष ठरवणे, ४)स्वागताध्यक्ष ठरवणे,५)कार्यक्रम रूपरेषा ठरवणे, ६) साहित्य संमेलनाची जबाबदार समिती ठरवणे. अध्यक्ष च्या परवानगीने आलेल्या विषयावर चर्चा करणे.ई.
श्री विनायक काळदाते कार्याध्यक्ष धनगर धर्मपीठ महाराष्ट्र राज्य यांनी व श्री समाधान बागल समाज सेवक नाशिक यांनी बैठकीचे आयोजन व नियोजन केले आहे.राज्य स्तरीय बैठकीला
खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मा.आमदार रामहरी रूपनवर अध्यक्ष पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.

प्राचार्य
श्री आर एस चोपडे सर अध्यक्ष अहिल्या शिक्षण संस्था सांगली. अध्यक्ष चौधे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
श्री संभाजीराव सुळ उपाध्यक्ष साहित्य संमेलन. मा.संचालक डीसीसी बॅक लातूर.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील व्हा.चेअरमन श्री श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडी.
प्रा.संजय शिंगाडे स्वागताध्यक्ष चौथे धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर सचिव आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
श्री श्रीराम हनुमंतराव पाटील बेलाटीकर सोलापूर, आयोजक पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपीआय ठाणे.
श्री चंद्रकांत हजारे प्रवक्ते आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
श्री उज्ज्वलकुमार माने लेखक, संपादक पत्रकार सोलापूर.

प्राचार्य डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक अध्यक्ष धनगर धर्मपीठ महाराष्ट्र राज्य व धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
श्री बिसलसिद्ध काळे पत्रकार, लेखक प्रसिद्धीप्रमुख आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.

READ MORE